अ‍ॅपशहर

पराभवानंतर हताश रोहित शर्माने दिला गंभीर इशारा; टी-२० वर्ल्डकपच्या आधी सुधारा नाही तर...

Ind vs Aus Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४ विकेटनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2022, 8:06 am
मोहाली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत (Ind vs Aus) भारताने ४ विकेटनी गमावली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत २०९ धावांचे विशाल लक्ष्य उभे केले होते, मात्र भारतीय गोलंदाज या धावांचा बचाव करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाविद्धची ही मालिका पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डपकच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे आणि पहिल्या सामन्यात झालेल्या या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma)ने काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit sharma


ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माने गोलंदाजांवरील नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. तसेच ऑस्ट्रेलियाने चांगला खेळ केल्याचे देखील तो म्हणाला. तसेच भारतीय गोलंदाजांनी त्याच्या चुका सुधारण्याची गरज असल्याचे तो म्हणाला.

वाचा- रोहित शर्मा करतोय एकच मोठी चूक... तीन सामने, तीन पराभव अन् फक्त एकच गोष्ट ठरतेय मारक

सामना झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित म्हणाला, मला वाटत नाही की आम्ही चांगली गोलंदाजी केली. २०० धावांचा बचाव करण्यासाठी एक चांगली संधी होती. आम्ही सामन्यात मिळालेल्या अनेक संधींचा फायदा घेतला नाही. संघाली फलंदाजांनी खुप चांगली खेळी केली, मात्र गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. ही अशी गोष्ट आहे ज्यावर लक्ष देण्याची गरज आहे. नेमके काय चुकले हे समजून घेण्याची चांगली संधी आहे.

वाचा- भारताच्या पराभवाचं एकमेव कारण, २०८ धावा करूनही का झाला लाजीरवाणा पराभव जाणून घ्या...

आम्हाला माहिती आहे की या मैदानावर धावा अधिक होतात. अशा ठिकाणी तुम्ही २०० पेक्षा अधिक धावा करून देखील विजयाची हमी देऊ शकत नाही. आम्ही काही प्रमाणात विकेट घेतल्या पण ते आमच्यापेक्षा अधिक चांगले खेळले. मी त्यांच्या चेंजिंग रुममध्ये असतो तर अशा धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याची अपेक्षा ठेवली असती. तुम्ही अखेरच्या ४ षटकात ६० धावांचा बचाव सहज करू शकला असता, असे रोहित म्हणाला.

अखेरच्या ४ षटकात मॅच गमावली

रोहितने सांगितले की, अखेरच्या ४ षटकात कोणीच चांगली गोलंदाजी केली नाही त्यामुळे संघाचा पराभव झाला. अखेरच्या काही षटकात आम्ही विकेट न घेतल्याने मॅच गेली. जर आणखी एखादी विकेट घेतली असती तर परिस्थितीती वेगळी असती. तुम्ही रोज २०० धावा नाही करू शकत त्यामुळे तुम्हाला चांगली गोलंदाजी करण्याची गरज असते. हार्दिकने चांगली फलंदाजी करत आम्हाला २०८ पर्यंत पोहोचवले होते. पुढील सामन्याच्या आधी गोलंदाजीवर लक्ष द्यावे लागणार आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख