अ‍ॅपशहर

'करो या मरो' सामन्यासाठी भारतीय संघात होणार तीन मोठे बदल, पाहा कोणाला संधी मिळणार

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात. कारण भारतासाठी हा सामना करो या मरो, असा असणार आहे. कारण हा सामना गमावल्यावर भारताचे या मालिकेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघात आता तीन मोठे बदल होणार आहेत. कोणाला संधी मिळणार, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 23 Sep 2022, 6:18 pm
नागपूर : भारताला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात. कारण भारतासाठी हा सामना करो या मरो, असा असणार आहे. कारण हा सामना गमावल्यावर भारताचे या मालिकेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघात आता तीन मोठे बदल होणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs aus
सौजन्य-ट्विटर

पहिला बदल....
या सामन्यासाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराचे पुनरागमन होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे जर बुमरा संघात आला तर संघातून बाहेर कोणाला काढायचे, हा मोठा प्रश्न असेल. पण या सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिली जाऊ शकते. कारण गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याच्याकडून चांगली गोलंदाजी झालेली नाही. त्यामुळे या सामन्यात त्याला एक ब्रेक दिला जाऊ शकतो.

दुसरा बदला
या सामन्यासाठी भारतीय संघात आता दीपक चहरला संधी दिली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण यापूर्वी नागपूरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना झाला होता. या सामन्यात चहरने ३.२ षटकांत फक्त सात धावा दिल्या होत्या आणि तब्बल सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. चहरच्या या कामगगिरीच्या जोरावर भारताने हा सामना ३० धावांनी जिंकला होता. त्यामुळे या सामन्यासाठी जर चहरला संधी दिली तर त्याचे मनोबल वाढू शकते आणि त्याचा फायदा भारताला होऊ शकतो. त्यामुळे चहरला या सामन्यात संधी मिळू शकते. पण चहरला संघात संधी द्यायची असेल तर हर्षल पटेल किंवा उमेश यादव यांच्यापैकी एकाला संघाबाहेर जावे लागू शकते.

तिसरा बदल...ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात युजवेंद्र चहल हा चांगलाच महागडा ठरला होता. कारण त्याने गेल्या सामन्यात ३.२ षटकांमध्ये ४२ धावा दिल्या होत्या. त्यामुळे आता या सामन्यासाठी चहलला संघाबाहेर केले जाऊ शकते. चहलच्या जागी संघात फिरकीपटूला स्थान द्यायचे कि अजून कोणाला, याचा निर्णय भारतीय संघाला घ्यावा लागेल. कदाचित चहलच्या जागी चहर संघात येईल आणि भारतीय संघ चार वेगदवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज