नवी दिल्ली: कौशल्य आणि उत्कटतेने भरलेला भारतीय क्रिकेट संघ बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC फायनल) अंतिम सामना खेळणार आहे. आयसीसी जेतेपदाचा दशकभराचा दुष्काळ संपवण्यासाठी रोहित शर्माच्या संघाचे लक्ष असणार आहे. डब्ल्यूटीसीच्या मागील दोन चक्रांमध्ये भारत हा सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ आहे. गेल्या १० वर्षांतील एक किंवा दोन स्पर्धा वगळता, भारत प्रत्येक वेळी नॉकआऊटमध्ये पोहोचला आहे, परंतु पुन्हा विजेतेपद जिंकू शकला नाही. कर्णधार म्हणून रोहितने कधीही फायनल गमावलेली नाही
यावेळी एक गोष्ट विशेष आहे, जी यापूर्वीच्या कोणत्याही स्पर्धेत घडलेली नाही. रोहित शर्मा प्रथमच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून रोहितने कोणत्याही स्पर्धेचा अंतिम सामना एकदाही गमावलेला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. प्रत्येक वेळी संघाने जेतेपद पटकावले आहे. चॅम्पियन्स लीगमध्येही मुंबईचे कर्णधार असताना रोहितने एकदा विजेतेपद पटकावले आहे. महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गज कर्णधाराला त्याने तीन वेळा पराभूत केले आहे.
टीम इंडियासाठी दोन फायनलही जिंकल्या
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकही फायनल जिंकता आलेली नाही. मात्र विराटने विश्रांती घेतल्यानंतर रोहित शर्माकडे कर्णधारपद मिळाले तेव्हा टीम इंडियाने दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने २०१८ मध्ये निदाहास ट्रॉफी जिंकली होती. आशिया कप २०१८ मध्येही रोहित शर्मा भारताचा कर्णधार होता. सर्वात रोमांचक बाब म्हणजे दोन्ही सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. आयपीएलमध्येही मुंबईने शेवटच्या चेंडूवर दोनदा विजय मिळवला आहे. म्हणजे नशीबही रोहित शर्माच्या बाजूने असते असे म्हणता येईल.
सर्वात मोठा असेल हा विजय
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली तर ती त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ट्रॉफी असेल. त्यामुळे भारतीय संघाचा दुष्काळही संपणार आहे.
यावेळी एक गोष्ट विशेष आहे, जी यापूर्वीच्या कोणत्याही स्पर्धेत घडलेली नाही. रोहित शर्मा प्रथमच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून रोहितने कोणत्याही स्पर्धेचा अंतिम सामना एकदाही गमावलेला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. प्रत्येक वेळी संघाने जेतेपद पटकावले आहे. चॅम्पियन्स लीगमध्येही मुंबईचे कर्णधार असताना रोहितने एकदा विजेतेपद पटकावले आहे. महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गज कर्णधाराला त्याने तीन वेळा पराभूत केले आहे.
टीम इंडियासाठी दोन फायनलही जिंकल्या
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकही फायनल जिंकता आलेली नाही. मात्र विराटने विश्रांती घेतल्यानंतर रोहित शर्माकडे कर्णधारपद मिळाले तेव्हा टीम इंडियाने दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने २०१८ मध्ये निदाहास ट्रॉफी जिंकली होती. आशिया कप २०१८ मध्येही रोहित शर्मा भारताचा कर्णधार होता. सर्वात रोमांचक बाब म्हणजे दोन्ही सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. आयपीएलमध्येही मुंबईने शेवटच्या चेंडूवर दोनदा विजय मिळवला आहे. म्हणजे नशीबही रोहित शर्माच्या बाजूने असते असे म्हणता येईल.
सर्वात मोठा असेल हा विजय
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली तर ती त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ट्रॉफी असेल. त्यामुळे भारतीय संघाचा दुष्काळही संपणार आहे.