अ‍ॅपशहर

इजा, बिजा, तिजा... भारतीय संघाला बसला तिसरा धक्का, रोहित शर्माने अखेर चुक मान्य केली अन्...

IND vs BAN : पहिल्या वनडेत भारताचा पराभव झाला. पण या सामन्यात एक मोठी चुक रोहित शर्माकडून झाली. रोहित शर्माने ही चूक मान्य केली. पण रोहित शर्माने चूक मान्य केल्यावर भारतीय संघाला आता दंड भरावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात रोहितच्या चुकीचा फटका भारतीय संघाला नेमका कसा बसला आहे, नेमकं काय घडलं जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 5 Dec 2022, 8:34 pm
मिरपूर : पराभवासहीतभारतीय संघाला आता तिसरा मोठा धक्का बसला आहे. पहिल्या वनडेत भारताचा पराभव झाला, त्यानंतर रिषभ पंत आता या मालिकेत खेळणार नसल्याचे बातमी मिळाली. त्यामुळे भारतीय संघासाठी हा दुष्काळात तेरावा महिना असल्याचे आता समोर आले आहे. कारण भारतीय संघाला आता तिसरा धक्का बसल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Sharma
सौजन्य-ट्विटर


रविवारी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती संथ राखल्याबद्दल भारतीय संघाला दंड ठोठावला गेला आहे. भारतीय संघाला आता त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या ८० टक्के रक्कम दंड स्वरुपात द्यावी लागणार आहे. या सामन्यासाठी रंजन मदुगले यांच्याकडे सामनाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

पहिल्या वनडे सामन्यात निर्धारीत वेळेपेक्षा भारतीय संघाने यावेळी चार षटके उशिरा टाकली. त्यामुळे भारतीय संघावर ही कारवाई करण्यात आली. आयसीसीच्या नियमानुसार जर निर्धारीत वेळेपेक्षा एक षटक कमी टाकले तर सामन्याच्या २० टक्के मानधन दंड स्वरुपात कापले जाते. भारताने या सामन्यात चार षटके उशिरा टाकली, त्यामुळे भारतीय खेळाडू, कर्णधार, सपोर्ट स्टाफ यांच्या मानधनातील ८० टक्के रक्कम कापली जाणार आहे.

आपल्याकडून चुक झाल्याचे रोहित शर्मा यावेळी मान्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची औपचारीक सुनावणी करण्यात आली नाही. जर रोहित शर्माने ही चूक मान्य केली नसती तर या प्रकरणाची चौकशी झाली असती. या प्रकरणी रोहितचे म्हणणे नेमके काय आहे, हे पहिल्यांदा ऐकले गेले असते. पण सामना संपल्यावर काही वेळात जेव्हा सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी रोहित शर्माला या चुकीबाबत सांगितले. रोहितने ही चूक तात्काळ मान्य केली. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही कारवाई औपचारीक सुनावणी करण्यात आली नाही. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजयाची सुवर्णसंधी होती. भारताला फक्त एकच विकेट मिळवायचा होता. पण भारतीय संघाने यावेळी दोन झेल सोडले आणि त्यांच्या हातून हा सामना निसटल्याचे पाहायला मिळाले.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज