अ‍ॅपशहर

भारतीय संघाबाहेर कसा गेला रिषभ पंत; समोर आलं आता खरं कारण, द्रविड-रोहितने तर...

Rishabh Pant : रिषभ पंत वनडे मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे पंतवर बीसीसीआयने कारवाई केली, असे म्हटले जात होते. त्यामुळेत पंतला यापुढे संधी मिळणार नाही, अशीही चर्चा होती. पण पंतने बांगलादेशमध्ये जाऊन सराव केला आणि त्यानंतर त्याला संघाबाहेर कसे करण्यात आले, हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 6 Dec 2022, 11:06 am
मिरपूर : रिषभ पंत आता बांगलादेशमधील वनडे मालिकेत खेळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पण रिषभ पंतने पहिल्या वनडेसाठी सरावही केला होता. पण सराव केल्यावरही पंत हा वनडे मालिकेतून बाहेर का गेला, याचे खरे कारण आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND vs BAN


रिषभ पंत हा चांगल्या फॉर्मात नव्हता, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले जात होते. पण ही गोष्ट खरी नसल्यचे आता समोर आले आहे. कारण न्यूझीलंडहून भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल झाला. तेव्हा पंत हा संघाबरोबर होता. त्यानंतर पंतने भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मां यांच्याबरोबर चर्चा केली. रोहित आणि द्रविड यांनी पंतला तर यावेळी काही सल्ला दिला. त्यानंतर पंत हा सरावासाठी नेट्समध्येही उतरला होता. पण तरीही पंत हा संघाबाहेर का पडला, याचे खरे कारण आता समोर आले आहे.

सध्याच्या घडीला पंतच्या धावा आटल्या आहेत. त्यामुळे आपण बांगलादेशमध्येही अपयशी ठरलो तर आपले संघात पुन्हा येणे कठीण होऊन बसेल, असे पंतला वाटले असावे. त्यामुळे पंतने या मालिकेसाठी आपल्याला विश्रांती हवी, असे सांगितले. त्यामुळे पंतला या मालिकेत न खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यामुळे आता पंत संघात कधी परतण्यासाठी प्रयत्न करणार आणि बीसीसीआय त्याला कधी संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

पंतने आपल्याला विश्रांती असल्याचे निर्णय प्रथम रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना कळवला. त्यानंतर त्याने बीसीसीआयला याबाबत विनंती केली. रिषभ पंत हा वनडे मालिकेत खेळणार नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने याबाबतचे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये बीसीसीआयने पंत हा या वनडे मालिकेत खेळणार नाही आणि त्याला विश्रांती देण्यात आली आहे, हे स्पष्ट केले आहे. पण त्याचबरोबर पंतच्या जागी भारतीय संघात कोणाला संधी द्यायची हा निर्णय़ मात्र बीसीसीआयने घेतलेला नाही. त्यामुळे आता पंतच्या जागी भारतीय संघात कोणता खेळाडू येणार, याची उत्सुकता सर्वांना असेल. पण अजूनही बीसीसीआयने पंतच्या जागी कोणाला संधी द्यायची, हा निर्णय घेतलेला नाही.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज