अहमदाबाद: ind vs eng 3rd t20i इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात शानदार विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचे लक्ष्य आता मालिकेत आघाडी घेण्याचे असेल. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ आता १-१ अशा बरोबरीत आहेत. पहिल्या सामन्यात खराब कामगिरी केल्याने भारताचा दारूण पराभव झाला होता. पण त्यानंतर भारताने इंग्लंडला आपल्या स्टाइलने उत्तर दिले. वाचा- जसप्रीत बुमराह आणि संजना विवाहबद्ध झाले, पाहा लग्नाचे फोटो
दुसऱ्या टी-२० भारताची सुरूवात खराब झाली. तरी पदार्पण करणाऱ्या इशान किशनने ३२ चेंडूत ५६ धावा करत इंग्लंडच्या हातातून सामना काढून घेतला. त्याच्या पाठोपाठ गेल्या काही सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
वाचा- इंग्लंडची धुलाई करणाऱ्या इशान किशनवर भडकला विराट कोहली, पाहा व्हिडिओ
तिसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. त्यामुळे भारताच्या विजयी संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. तरी संघातील नियमीत सलामीवीर रोहित शर्माला दोन सामन्यातील विश्रांतीनंतर संघात स्थान दिले जाऊ शकते. गेल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेला केएल राहुल अन्य कोणत्या तरी स्थानावर जागा दिली जाऊ शकते.
वाचा- इशानने सर्वांचे मन जिंकले; सामनावीर पुरस्कार या व्यक्तीला समर्पित केला
भारतीय संघाचे लक्ष्य ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपवर आहे. त्यामुळेच संघातील युवा खेळाडूंना देखील संधी देऊन त्यांची क्षमता पाहण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार असू शकतो. असे असले तरी चाहत्यांना मात्र हिटमॅन रोहित शर्माला मैदानावर पाहायचे आहे.
वाचा- पराभवानंतर ही सुधारला नाही क्रिकेटपटू; भारतीय संघाचा पुन्हा असा उल्लेख केला
भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतीया, इशान किशन
दुसऱ्या टी-२० भारताची सुरूवात खराब झाली. तरी पदार्पण करणाऱ्या इशान किशनने ३२ चेंडूत ५६ धावा करत इंग्लंडच्या हातातून सामना काढून घेतला. त्याच्या पाठोपाठ गेल्या काही सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
वाचा- इंग्लंडची धुलाई करणाऱ्या इशान किशनवर भडकला विराट कोहली, पाहा व्हिडिओ
तिसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. त्यामुळे भारताच्या विजयी संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. तरी संघातील नियमीत सलामीवीर रोहित शर्माला दोन सामन्यातील विश्रांतीनंतर संघात स्थान दिले जाऊ शकते. गेल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेला केएल राहुल अन्य कोणत्या तरी स्थानावर जागा दिली जाऊ शकते.
वाचा- इशानने सर्वांचे मन जिंकले; सामनावीर पुरस्कार या व्यक्तीला समर्पित केला
भारतीय संघाचे लक्ष्य ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपवर आहे. त्यामुळेच संघातील युवा खेळाडूंना देखील संधी देऊन त्यांची क्षमता पाहण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार असू शकतो. असे असले तरी चाहत्यांना मात्र हिटमॅन रोहित शर्माला मैदानावर पाहायचे आहे.
वाचा- पराभवानंतर ही सुधारला नाही क्रिकेटपटू; भारतीय संघाचा पुन्हा असा उल्लेख केला
भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतीया, इशान किशन