मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन येथील कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने खेळाडूंसह चाहत्यांची देखील निराशा झाली. यानंतर टीम इंडिया आता इंग्लंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांसाठी सज्ज होत आहे. आजपासून मालिकेला सुरुवात होत आहे. यामधून भारतीय संघ आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी योग्य संघ नियोजनाची तयारी सुरु करेल. पण आगामी मालिकेत खेळाडूंवर टांगती तलवार असेल, ज्यांना इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल. पण इंग्लंडविरुद्ध मालिकेत केलेली एकही चूक त्यांना भारतीय संघातून बाहेर करण्यासाठी निवडकर्त्यांना भाग पाडू शकते. १. विराट कोहली
भारतीय संघाचा माजी कर्णधार गेल्या काही वर्षांपासून तिहेरी धावसंख्येचा संघर्ष करत आहे. विराटने आयपीएल २०२२ मध्ये परतण्यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध अंतिम टी-२० सामना खेळला होता. विराटने आयपीएलच्या १६ सामन्यात ३४१ धावा करून पुन्हा एकदा चाहत्यांच्या आशा उंचावल्या आहेत. विशेषतः विश्वचषकसाठी आता काही महिने शिल्लक असताना विराटसमोर स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान असेल. विराटने गेल्या सात टी-२० सामन्यात १५७ धावा केल्या आहेत.
वाचा - Virat Kohli News:विराटचा काऊंटडाऊन सुरू; फक्त १० दिवस शिल्लक, संघातून मिळू शकतो डच्चू
२. ऋषभ पंत
ऋषभ पंत इंग्लंडमध्ये एक गेमचेंजर ठरू शकतो, पण त्याच्यापुढे संजू सॅमसन आणि दिनेश कार्तिकच्या रूपात मोठी स्पर्धा आहे. सॅमसन आणि कार्तिक डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी फलंदाजी करत असताना पंत संघर्ष करताना दिसत आहे. आपण वेळ पडल्यास सामन्याचे चित्र बदलण्यास सक्षम असल्याचे पंतने वेळोवेळी सिद्ध केले आहे पण त्याला आपला प्रासंगिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
३. भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमारने आयर्लंड दौऱ्यानंतर संघात आपल्या जागेवर दावा ठोकला आहे, पण त्यालाही मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल. भुवनेश्वर कुमार गेल्या काही काळात दुखापत आणि आपल्या खेळात सातत्य राखण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला इंग्लंड दौरा गाजवणे गरजेचे असेल. भुवीला मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराहकडून कडवी स्पर्धा मिळत आहे.
वाचा - सासरी सापडला कुस्तीपटूचा मृतदेह; मृत्यूच्याआधी फेसबुक लाइव्हमध्ये केला गंभीर आरोप
४. श्रेयस अय्यर
मायदेशात श्रीलंकेविरुद्ध बॅटने धमाल करणारा श्रेयस अय्यर देखील धावा करण्यासाठी आता धडपडत आहे. अय्यरने श्रीलंकेविरुद्ध सलग अर्धशतके केली आणि प्रत्येकी वेळीस नाबाद परतला. पण आयपीएलमध्ये तो आपली लय कायम ठेवण्यात अपयशी ठरला. तसेच सूर्यकुमार यादव भारताच्या मधल्या फळीतील चौथ्या स्थानाचा प्रबळ दावेदार असल्याने अय्यरसाठी इंग्लंड मालिका महत्वपूर्ण ठरेल.
वाचा - रोहित शर्मा कार्डिओव्हॅस्क्युलर टेस्टनंतरच खेळू शकणार, ही चाचणी का केली जाते
५. रोहित शर्मा
कर्णधार रोहित शर्माचे नाव या यादीत असणे टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकते. आयपीएल २०२२ मध्ये विराट खराब फॉर्ममध्ये होता तर रोहितची स्थिती अत्यंत खराब होती. हिटमॅन १४ आयपीएल सामन्यात अवघ्या २६८ धावाच करू शकला. याशिवाय मुंबईने सलग ८ सामने गामवल्यावर रोहितच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित झाले. याशिवाय मोठ्या अपेक्षा असताना रोहितला कोरोना झाला, ज्यामुळे त्याच्या खेळण्यावर एकूणच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तसेच टी-२० विश्वचषकच्या दृष्टीने रोहितवर सर्वांचीच नजर असेल.
भारतीय संघाचा माजी कर्णधार गेल्या काही वर्षांपासून तिहेरी धावसंख्येचा संघर्ष करत आहे. विराटने आयपीएल २०२२ मध्ये परतण्यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध अंतिम टी-२० सामना खेळला होता. विराटने आयपीएलच्या १६ सामन्यात ३४१ धावा करून पुन्हा एकदा चाहत्यांच्या आशा उंचावल्या आहेत. विशेषतः विश्वचषकसाठी आता काही महिने शिल्लक असताना विराटसमोर स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान असेल. विराटने गेल्या सात टी-२० सामन्यात १५७ धावा केल्या आहेत.
वाचा - Virat Kohli News:विराटचा काऊंटडाऊन सुरू; फक्त १० दिवस शिल्लक, संघातून मिळू शकतो डच्चू
२. ऋषभ पंत
ऋषभ पंत इंग्लंडमध्ये एक गेमचेंजर ठरू शकतो, पण त्याच्यापुढे संजू सॅमसन आणि दिनेश कार्तिकच्या रूपात मोठी स्पर्धा आहे. सॅमसन आणि कार्तिक डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी फलंदाजी करत असताना पंत संघर्ष करताना दिसत आहे. आपण वेळ पडल्यास सामन्याचे चित्र बदलण्यास सक्षम असल्याचे पंतने वेळोवेळी सिद्ध केले आहे पण त्याला आपला प्रासंगिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
३. भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमारने आयर्लंड दौऱ्यानंतर संघात आपल्या जागेवर दावा ठोकला आहे, पण त्यालाही मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल. भुवनेश्वर कुमार गेल्या काही काळात दुखापत आणि आपल्या खेळात सातत्य राखण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला इंग्लंड दौरा गाजवणे गरजेचे असेल. भुवीला मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराहकडून कडवी स्पर्धा मिळत आहे.
वाचा - सासरी सापडला कुस्तीपटूचा मृतदेह; मृत्यूच्याआधी फेसबुक लाइव्हमध्ये केला गंभीर आरोप
४. श्रेयस अय्यर
मायदेशात श्रीलंकेविरुद्ध बॅटने धमाल करणारा श्रेयस अय्यर देखील धावा करण्यासाठी आता धडपडत आहे. अय्यरने श्रीलंकेविरुद्ध सलग अर्धशतके केली आणि प्रत्येकी वेळीस नाबाद परतला. पण आयपीएलमध्ये तो आपली लय कायम ठेवण्यात अपयशी ठरला. तसेच सूर्यकुमार यादव भारताच्या मधल्या फळीतील चौथ्या स्थानाचा प्रबळ दावेदार असल्याने अय्यरसाठी इंग्लंड मालिका महत्वपूर्ण ठरेल.
वाचा - रोहित शर्मा कार्डिओव्हॅस्क्युलर टेस्टनंतरच खेळू शकणार, ही चाचणी का केली जाते
५. रोहित शर्मा
कर्णधार रोहित शर्माचे नाव या यादीत असणे टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकते. आयपीएल २०२२ मध्ये विराट खराब फॉर्ममध्ये होता तर रोहितची स्थिती अत्यंत खराब होती. हिटमॅन १४ आयपीएल सामन्यात अवघ्या २६८ धावाच करू शकला. याशिवाय मुंबईने सलग ८ सामने गामवल्यावर रोहितच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित झाले. याशिवाय मोठ्या अपेक्षा असताना रोहितला कोरोना झाला, ज्यामुळे त्याच्या खेळण्यावर एकूणच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तसेच टी-२० विश्वचषकच्या दृष्टीने रोहितवर सर्वांचीच नजर असेल.