अ‍ॅपशहर

IND Vs NZ : तिसऱ्या वनडेत इतके टक्के पावसाची शक्यता, मालिकाच गमवण्याची भारताला भिती

टी-२० वर्डकल्प गेल्याने भारतीय संघ आता आगामी वनडे वर्ल्डकपसाठी तयारी लागला आहे. भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर वनडे मालिका जिंकणं आणि क्रिकेटपटूंना उत्तम कामगिरी करून त्यात सातत्य राखणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेकडे पाहिलं जात आहे. ही मालिका बरोबरीत सोडवण्याच्या भारताच्या आपेक्षांवर पावसाचे पाणी फिरण्याची दाट शक्यता आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2022, 9:39 pm
क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंडमधील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना हा उद्या होणार आहे. या सामना क्राइस्टचर्च इथं भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तर दुसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india vs new zealand odi match
तिसऱ्या वनडेत इतके टक्के पावसाची शक्यता, मालिकाच गमवण्याची भारताला भिती ( प्रातिनिधिक फोटो )


आता मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यावरही पावसाचे सावट आहे. पावसामुळे हा सामनाही खेळवला गेली नाही तर त्याचा फायदा न्यूझीलंडला होईल. कारण न्यूझीलंड मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. सामना झाला तर कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वात हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा भारताचा पुरेपूर प्रयत्न असेल.

क्राइस्टचर्चमध्ये पावसाची शक्यता ७६ टक्के

हवामान अंदाजानुसार क्राइस्टचर्चमध्ये पावसाची शक्यता ही ७६ टक्के आहे. असं झाल्यास पावसामुळे सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे. क्राइस्टचर्चमध्ये कमाल तापमान हे १८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी ढग गोळा होण्याची शक्यता ८७ टक्के आहे.

IND vs NZ: तिसऱ्या वनडेसाठी झोप मोड होणार; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग

कशी आहे मैदानाची खेळपट्टी?

क्राइस्टचर्चमधील सामन्यात भारतीय फलंदाजांची अग्निपरीक्षा असेल. क्राइस्टचर्चमधील हेगले ओवल मैदान हे पारंपरिक चेंडू स्विंग करणाऱ्या गोलंदाजांसाठी मदतगार आहे. गेल्या काही वर्षात या मदानावरील डावसंख्याही २३० पर्यंत राहिली आहे. यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजांना आपली उत्तम कामगिरी दाखवावी लागणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात स्थान निश्चित करणाऱ्यासाठी खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

फक्त एक टी-२० मॅच खेळणाऱ्याचे नाव कर्णधारपदासाठी; माजी खेळाडू म्हणाला, टीम इंडियाचे नशीब बदलेल

महत्वाचे लेख