नेपियर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली. त्यानंतर दुसऱ्या लढती भारताने ६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता मालिकेतील अखेरची लढत उद्या २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ही लढत जिंकून टीम इंडिया मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला यजमान न्यूझीलंडचा संघ मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल.
नेपियर येथे होणारी ही लढत दोन्ही संघासाठी निर्णयाक असेल. दोन्ही संघातील आकडेवारीचा विचार केल्यास भारताचे पारडे जड असल्याचे दिसून येते.
दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या २२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताने १२ मॅच जिंकल्या आहेत. तर न्यूझीलंडने ९ लढतीत विजय मिळवला आहे. या शिवाय एक मॅच पावसामुळे रद्द झाली. आकडेवारीचा विचार करता भारताचे पारडे जड आहे. विशेष म्हणजे १२ पैकी ७ लढती या भारताने देशाबाहेर जिंकल्या आहेत. न्यूझीलंडच्या घरच्या मैदानावर हरवण्याची क्षमता भारतीय संघात आहे.
भारताने २०२० मध्ये झालेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा त्यांच्या घरच्या मैदानावर ५-० असा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी देखील टीम इंडिया अशीच कामगिरी करण्याची आशा आहे. टी-२० वर्ल्डकपमधील सेमीफायनल लढतीत झालेल्या पराभवानंतर भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे दिले गेले. २०२४ साली होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी हार्दिककडे संघाचे नेतृत्व दिले जाईल अशी चर्चा आहे. ही मालिका म्हणजे त्याचीच एक सुरुवात असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
न्यूझीलंडला बसला झटका
दरम्यान तिसऱ्या टी-२० सामन्याआधी न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन हा तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. केनला नियोजित कार्यक्रमानुसार डॉक्टरांना भेटायचे आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांना भेटायचे होते. पण संघाच्या बिझी कार्यक्रमामुळे त्याला वेळ देता आला नाही. केनच्या गैरहजेरीत मार्क चॅपमॅन याचा संघाच समावेश करण्यात आला आहे.
संभाव्य भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्धदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
नेपियर येथे होणारी ही लढत दोन्ही संघासाठी निर्णयाक असेल. दोन्ही संघातील आकडेवारीचा विचार केल्यास भारताचे पारडे जड असल्याचे दिसून येते.
दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या २२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताने १२ मॅच जिंकल्या आहेत. तर न्यूझीलंडने ९ लढतीत विजय मिळवला आहे. या शिवाय एक मॅच पावसामुळे रद्द झाली. आकडेवारीचा विचार करता भारताचे पारडे जड आहे. विशेष म्हणजे १२ पैकी ७ लढती या भारताने देशाबाहेर जिंकल्या आहेत. न्यूझीलंडच्या घरच्या मैदानावर हरवण्याची क्षमता भारतीय संघात आहे.
भारताने २०२० मध्ये झालेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा त्यांच्या घरच्या मैदानावर ५-० असा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी देखील टीम इंडिया अशीच कामगिरी करण्याची आशा आहे. टी-२० वर्ल्डकपमधील सेमीफायनल लढतीत झालेल्या पराभवानंतर भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे दिले गेले. २०२४ साली होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी हार्दिककडे संघाचे नेतृत्व दिले जाईल अशी चर्चा आहे. ही मालिका म्हणजे त्याचीच एक सुरुवात असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
न्यूझीलंडला बसला झटका
दरम्यान तिसऱ्या टी-२० सामन्याआधी न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन हा तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. केनला नियोजित कार्यक्रमानुसार डॉक्टरांना भेटायचे आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांना भेटायचे होते. पण संघाच्या बिझी कार्यक्रमामुळे त्याला वेळ देता आला नाही. केनच्या गैरहजेरीत मार्क चॅपमॅन याचा संघाच समावेश करण्यात आला आहे.
संभाव्य भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्धदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक