साऊदम्पटन : फायनलचा महत्वाचा सामना सुरु असताना भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा अचानक मैदान सोडून गेल्याचे पाहायला मिळाले. पंत जेव्हा मैदान सोडून जात होता, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा आता झाला आहे.
नेमकं घडलं तरी काय होतं, पाहा...
फायनलचा सामना तिसऱ्या सत्रात चांगलाच रंगात आला होता. यावेळी भारताला विकेट्सची गरज होती. पण तिसऱ्या सत्रात भारताची २८ षटके झाल्यावर रिषभ पंतने अचानक मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. पंत मैदान का सोडतोय, हे त्यावेळी कोणालाच कळले नव्हते. पण भारतासाी हा एक मोठा धक्का असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे २९व्या षटकापासून वृद्धिमान साहा हा यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर काहीवेळात पंतने मैदान का सोडले, याचा खुलासा करण्यात आला.
पंतने मैदान सोडले तेव्हा काही वेळाने समालोचन करणाऱ्या इयान बिशप यांनी यामागचे कारण सांगितले. बिशप यांनी सांगितले की, " सामना खेळत असताना पंतला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या जागी आता वृद्धिमान साहा यष्टीरक्षण करत आहे."
याबाबतचा खुलासा आयपीएमध्ये खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघानेही केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने काल याबाबतचे एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी पंतला अस्वस्थ वाटत असल्यामुळेच साहाला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. भारताने न्यूझीलंडपुढे १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने न्यूझीलंडच्या सलामीवीरांना झटपट बाद केले होते. पण त्यानंतर केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
भारताला पहिल्या सत्रात कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या रुपात मोठे धक्के बसले. त्यामुळे भारतीय संघाला डाव आता गडगडणार असे वाटत होते. पण त्यावेळी रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या संघाच्या मदतीला धावून आले. कारण या दोघांनी पहिल्या सत्राच्या अखेरीस आक्रमक फलंदाजी करत चांगल्या धावा जमवल्या. ही जोडी आता भारताला मोठी धावसंख्या उभारून देइल, असे वाटत होते. दुसऱ्या सत्रात पंत आणि जडेजाकडून संघाला फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण या दोघांनीही यावेळी भारतीय चाहत्यांचा अपेक्षा भंग केला. कारण दुसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यावर काही वेळातच पहिल्यांदा रवींद्र जडेजा (१६) बाद झाला. जडेजा बाद झाल्यावर संघाची जबाबदारी पंतच्या खांद्यावर आली होती. पण पंत यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. पंतने यावेळी चार चौकारांच्या जोरावर ४१ धावांची खेळी साकारली.
नेमकं घडलं तरी काय होतं, पाहा...
फायनलचा सामना तिसऱ्या सत्रात चांगलाच रंगात आला होता. यावेळी भारताला विकेट्सची गरज होती. पण तिसऱ्या सत्रात भारताची २८ षटके झाल्यावर रिषभ पंतने अचानक मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. पंत मैदान का सोडतोय, हे त्यावेळी कोणालाच कळले नव्हते. पण भारतासाी हा एक मोठा धक्का असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे २९व्या षटकापासून वृद्धिमान साहा हा यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर काहीवेळात पंतने मैदान का सोडले, याचा खुलासा करण्यात आला.
पंतने मैदान सोडले तेव्हा काही वेळाने समालोचन करणाऱ्या इयान बिशप यांनी यामागचे कारण सांगितले. बिशप यांनी सांगितले की, " सामना खेळत असताना पंतला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या जागी आता वृद्धिमान साहा यष्टीरक्षण करत आहे."
याबाबतचा खुलासा आयपीएमध्ये खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघानेही केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने काल याबाबतचे एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी पंतला अस्वस्थ वाटत असल्यामुळेच साहाला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. भारताने न्यूझीलंडपुढे १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने न्यूझीलंडच्या सलामीवीरांना झटपट बाद केले होते. पण त्यानंतर केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
भारताला पहिल्या सत्रात कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या रुपात मोठे धक्के बसले. त्यामुळे भारतीय संघाला डाव आता गडगडणार असे वाटत होते. पण त्यावेळी रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या संघाच्या मदतीला धावून आले. कारण या दोघांनी पहिल्या सत्राच्या अखेरीस आक्रमक फलंदाजी करत चांगल्या धावा जमवल्या. ही जोडी आता भारताला मोठी धावसंख्या उभारून देइल, असे वाटत होते. दुसऱ्या सत्रात पंत आणि जडेजाकडून संघाला फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण या दोघांनीही यावेळी भारतीय चाहत्यांचा अपेक्षा भंग केला. कारण दुसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यावर काही वेळातच पहिल्यांदा रवींद्र जडेजा (१६) बाद झाला. जडेजा बाद झाल्यावर संघाची जबाबदारी पंतच्या खांद्यावर आली होती. पण पंत यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. पंतने यावेळी चार चौकारांच्या जोरावर ४१ धावांची खेळी साकारली.