अ‍ॅपशहर

पावसामुळे सामना रद्द न होण्यासाठी शुभमन गिलने सांगितली भन्नाट आयडिया, पाहा काय म्हणाला...

IND vs NZ: या दौऱ्यातील आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांपैकी तीन सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे खेळाडू आणि चाहते यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे जर पावसामुळे सामने रद्द होऊ द्यायचे नसतील, तर नेमकं काय करायला हवं, याबाबत आता भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने कोणती आयडिया सांगितली आहे, जाणून घ्या...

Research byप्रसाद लाड | Maharashtra Times 28 Nov 2022, 10:40 am
हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना पावसामुळे रद्द करावा लागला. यापूर्वी न्यूझीलंडमधील दोन टी-२० सामनेही रद्द करावे लागले. पण आता पावसामुळे सामना रद्द होता कामा नये, यासाठी भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने एक अफलातून आयडिया सांगितली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND vs NZ
सौजन्य-ट्विटर


भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलला वाटते की, पावसामुळे प्रभावित झालेले सामने खेळाडू आणि प्रेक्षक दोघांसाठी निराशाजनक असतात. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द होू नये, अशी सर्वांचीच इच्छा असते. पण पावसामुळे हिरमोड होतो. पण ही गोष्ट टाळण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत गिलने एक चांगली संकल्पना मांडली आहे.

गिलने यावेळी सांगितले की, " भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावर टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत पावसाचा परिणाम झाला आहे. या दौऱ्यातील आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांपैकी तीन सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे खेळाडू आणि चाहते यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे जर पावसामुळे सामने रद्द होऊ द्यायचे नसतील, तर त्याच्यासाठी बंद छप्पर स्टेडियम हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण जर स्टेडियमला छप्पर बसवण्यात आले तर पावसाचा कोणताही विपरीत परीणाम सामन्यावर होणार नाही आणि त्यामुळे निर्विघ्नपणे खेळाचा आनंद चाहत्यांनाही लुटता येऊ शकतो. त्यामुळे ही संकलप्ना नक्कीच उपयुक्त ठरू शकते."

पहिल्या एकदिवसीय सामन्यात गिलने ५० धावा केल्या होत्या, त्यानंतर गिलने दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द होण्यापूर्वी नाबाद ४५ धावा केल्या. सध्याच्या घडीला गिल चांगल्या फॉर्मात आहे. पण हा दुसरा सामना रद्द झाल्यावर तो म्हणाला की, "जेव्हा सामन्यांवर पावसाचा परिणाम होतो, तेव्हा खूप निराशा होते. सामने इनडोअर स्टेडियममध्ये खेळायचे की नाही, हे बोर्डाने ठरवायचे आहे. एक खेळाडू आणि चाहता या नात्याने पावसामुळे इतक्या सामन्यांवर परिणाम होत असल्याचे पाहून त्रास होतो. याबद्दल मी काय बोलू कारण हा एक मोठा निर्णय आहे. बंद छप्पर असलेली स्टेडियम नक्कीच एक चांगला पर्याय असेल.”


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्या पावसाच्या व्यत्ययानंतर षटकांची संख्या २९ पर्यंत कमी करण्यात आली होती परंतु सामन्यात फक्त १२.५ षटके खेळली गेली. त्यामुळे बंद छप्पर स्टेडियम हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे यापुढे गिलचा हा पर्याय गंभीरपणे घेतला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख