कानपूर : भारताच्या फिरकीपटूंनी आज अचूक आणि भेदक मारा केला आणि न्यूझीलंडच्या संघाला आपल्या जाळ्यात ओढले. भारताने न्यूझीलंडचा पहिला डाव २९६ धावांत आटोपला. भारताकडून यावेळी सर्वाधिक पाच विकेट्स अक्षर पटेलने पटकावले, अक्षरला यावेळी तीन विकेट्स मिळवत अश्विननने चांगली साथ दिली. उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. पहिल्या डावात न्यूझीलंडला तिनशे धावांच्या आतमध्ये ऑलआऊट करत भारताने ४९ धावांची आघाडी घेतली आहे.
तिसऱ्या दिवशी अश्विनने न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगला भरतकरवी झेलबाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. यंगने यावेळी १५ चौकारांच्या जोरावर ८९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर उमेश यादवने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यामुळए तिसऱ्या दिवशीच्या उपहारापर्यंत न्यूझीलंडची २ बाद १९७ अशी स्थिती झाली होती. पण उपहारानंतर भारताच्या फिरकीपटूंनी भन्नाट मारा केला आणि न्यूझीलंडच्या संघाला अडचणीत आणले. खासकरून अक्षर पटेलने यावेळी न्यूझीलंडाल एकामागून एक धक्के दिले. अक्षरने पहिल्यांदा न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरला बाद करत न्यूझीलंडला धक्का दिला. टेलरला यावेळी ११ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर अक्षरने हेन्री निकोल्सला पायचीत पकडत न्यूझीलंडला अजून एक धक्का दिला.
न्यूझीलंडची पडझड होत असताना सलामीवीर टॉम लॅथम हा दमदार फलंदाजी करत शतकाच्या जवळ पोहोचला होता. पण अक्षरने यावेळी लॅथमला बाद केले आणि न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. लॅथमने यावेळी १० चौकारांच्या जोरावर ९५ धावा केल्या आणि त्याचे शतक फक्त पाच धावांनी हुकल्याचे पाहायला मिळाले. लॅथम बाद झाल्यावर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र हा संघासाठी धावा जमवत होता, पण रवींद्र जडेजाने त्याला त्रिफळाचीत केले आणि संघाला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर न्यूझीलंडचे तळाचे फलंदाज जास्त धाा करू शकले नाहीत.
अश्विन आणि पंचांमध्ये मैदानातच झाला राडा...
७७व्या षटकात अश्विन जेव्हा गोलंदाजी करत तेव्हा त्याला पंच मेनन यांनी एक ताकिद दिली. अश्विन गोलंदाजी करत असताना त्याच्या पायामुळे खेळपट्टी खराब होत असल्याचे पंचांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर अश्विन राऊंड द विकेट गोलंदाजी करत असल्यामुळे आपल्याला सामना दिसत नाही आणि नॉन स्ट्रायकरलाही या गोष्टीचा त्रास होत असल्याचे सांगितले. पण आपल्यामुळे खेळपट्टीचे कोणतेही नुकसान होत नसल्याचे अश्विनने यावेळी स्पष्ट केले. पण मेनन यावेळी आपल्या मतानर ठाम राहीले आणि त्यानंतर हा वाद वाढत गेला. अश्विन आणि मेनन यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय पाहण्यासाठी कर्णधार अजिंक्य रहाणे यावेळी धावत त्यांच्याजवळ गेला. पण पंच मेनन यांनी अजिंक्यचेही यावेळी ऐकून घेतले नाही.
तिसऱ्या दिवशी अश्विनने न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगला भरतकरवी झेलबाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. यंगने यावेळी १५ चौकारांच्या जोरावर ८९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर उमेश यादवने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यामुळए तिसऱ्या दिवशीच्या उपहारापर्यंत न्यूझीलंडची २ बाद १९७ अशी स्थिती झाली होती. पण उपहारानंतर भारताच्या फिरकीपटूंनी भन्नाट मारा केला आणि न्यूझीलंडच्या संघाला अडचणीत आणले. खासकरून अक्षर पटेलने यावेळी न्यूझीलंडाल एकामागून एक धक्के दिले. अक्षरने पहिल्यांदा न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरला बाद करत न्यूझीलंडला धक्का दिला. टेलरला यावेळी ११ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर अक्षरने हेन्री निकोल्सला पायचीत पकडत न्यूझीलंडला अजून एक धक्का दिला.
न्यूझीलंडची पडझड होत असताना सलामीवीर टॉम लॅथम हा दमदार फलंदाजी करत शतकाच्या जवळ पोहोचला होता. पण अक्षरने यावेळी लॅथमला बाद केले आणि न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. लॅथमने यावेळी १० चौकारांच्या जोरावर ९५ धावा केल्या आणि त्याचे शतक फक्त पाच धावांनी हुकल्याचे पाहायला मिळाले. लॅथम बाद झाल्यावर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र हा संघासाठी धावा जमवत होता, पण रवींद्र जडेजाने त्याला त्रिफळाचीत केले आणि संघाला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर न्यूझीलंडचे तळाचे फलंदाज जास्त धाा करू शकले नाहीत.
अश्विन आणि पंचांमध्ये मैदानातच झाला राडा...
७७व्या षटकात अश्विन जेव्हा गोलंदाजी करत तेव्हा त्याला पंच मेनन यांनी एक ताकिद दिली. अश्विन गोलंदाजी करत असताना त्याच्या पायामुळे खेळपट्टी खराब होत असल्याचे पंचांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर अश्विन राऊंड द विकेट गोलंदाजी करत असल्यामुळे आपल्याला सामना दिसत नाही आणि नॉन स्ट्रायकरलाही या गोष्टीचा त्रास होत असल्याचे सांगितले. पण आपल्यामुळे खेळपट्टीचे कोणतेही नुकसान होत नसल्याचे अश्विनने यावेळी स्पष्ट केले. पण मेनन यावेळी आपल्या मतानर ठाम राहीले आणि त्यानंतर हा वाद वाढत गेला. अश्विन आणि मेनन यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय पाहण्यासाठी कर्णधार अजिंक्य रहाणे यावेळी धावत त्यांच्याजवळ गेला. पण पंच मेनन यांनी अजिंक्यचेही यावेळी ऐकून घेतले नाही.