अ‍ॅपशहर

हार्दिक पंड्या ठरवूनच आला होता; Live सामन्यात कार्तिकला म्हणाला...; तेथेच पाकिस्तानचा पराभव निश्चित झाला

Hardik Pandya: आशिया कप २०२२मध्ये भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेटनी पराभव केला. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला ऑलराउंडर हार्दिक पंड्या...

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2022, 9:52 pm
दुबई: अनेक वेळा एखादी व्यक्ती अडचणीत असते किंवा काही टेन्शनमध्ये असतो तेव्हा त्याचा मित्र सहज बोलून जाते, तू काळजी करू नको, तुझा भाऊ सर्व संभाळून घेईल. आशिया कपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत अखेरच्या षटकात पोहोचली तेव्हा वरील वाक्याची आठवण करून देणारी एक घटना घडली. याचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Hardik Pandya


पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १४८ धावांचे आव्हान दिले होते. खराब सुरुवातीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. पण हे दोघे एकापाठोपाठ बाद झाले आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव देखील फार मोठी धावसंख्या करू शकला नाही. सूर्यकुमारच्या जागी आलेल्या हार्दिक पंड्याने रविंद्र जडेजासोबत ५० धावांची भागिदारी केली आणि सामना पाकिस्तानच्या हातातून काढून घेतला.

वाचा-भारताने पाकिस्तानवर फक्त विजय नाही मिळवला तर...

अखेरच्या १२ चेंडूत भारताला २१ धावांची गरज होती. तेव्हाच हार्दिकने धुलाई सुरू केली. त्याने १९व्या षटकात १४ धावा वसुल केल्या, त्यामुळे अखेरच्या ६ षटकात भारताला ७ धावा असे समीकरण झाले. २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जडेजा बोल्ड झाला. त्याच्या जागी दिनेश कार्तिक मैदानावर आला. कार्तिकने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि हार्दिककडे स्ट्राइक आला. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिकला धाव घेता आली नाही. तेव्हाच हार्दिकने कार्तिकला इशारा केला. त्याने फक्त मान हलवली आणि कार्तिकला सांगितले की, भावा तु काळजी करू नको मी आहे.

वाचा- क्रिकेटमध्ये पुन्हा घडले सलग ६ चेंडूवर ६ षटकार; पाहा कोणत्या खेळाडूने आणि कोणाची केली धुलाई

हार्दिकची ती रिएक्शन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कारण या रिएक्शननंतर पुढच्या चेंडूवर त्याने कडकडीत षटकार मारला आणि भारताने विजय साकारला. सोशल मीडियावर सर्वजण हार्दिकच्या या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत.



हार्दिकने आधी चेंडूने पाकिस्तानची दाणादाण उडवली, नंतर फलंदाजी करताना बॅटने धुलाई केली. त्याने २५ धावात ३ विकेट घेतल्या. तर १७ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख