अ‍ॅपशहर

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात होणार मोठे बदल, कोणाला मिळणार संधी जाणून घ्या...

IND vs SA : भारतासाठी दुसरा टी-२० सामना हा महत्वाचा असेल. कारण या सामन्यात भारताने विजय मिळवला तर त्यांना मालिका जिंकता येऊ शकते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात नेमके कोणते बदल होतात, या लढतीसाठी कोणाला संधी मिळते आणि कोणाला संघाबाहेर केले जाते, याकडे आता क्रिकेट जगताचे लक्ष लागलेले असणार आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 1 Oct 2022, 9:01 pm
गुवाहाटी : भारताने पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय साकारला. आता दुसरा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका सहजपणे खिशात टाकता येऊ शकते. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs sa
सौजन्य-ट्विटर

पहिला बदल...
गेल्या काही सामन्यांपासून दिनेश कार्तिक हा चांगल्या फॉर्मात दिसत आहे. त्यामुळे रिषभ पंतचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यासाठी संघात बदल हा पंतच्या जागेसाठी होऊ शकतो. कारण दोन यष्टीरक्षक संघात ठेवण्यापेक्षा एका फलंदाजाल किंवा एका अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान देण्याला भारतीय संघाची पसंती असेल. त्यामुळे या सामन्यासाठी पंतच्या जागी एखादा फलंदाज संघात स्थान मिळवू शकतो.

दुसरा बदल...
भारतीय संघात सध्याच्या घडीला बदलाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला विश्रांती दिली जाऊ शकते. कारण गेल्या सामन्यात त्याने गोलंदाजी केली असली तरी तो पूर्णणे फिट दिसत नव्हता. त्यामुळे या सामन्यात दुसरा बदल हा हर्षल पटेलच्या रुपात होऊ शकतो. त्यामुळे हर्षलला विश्रांती दिली तर त्याच्याजागी वेगवान गोलंदाजाला संघात स्थान द्यायचे की फिरकीपटूला संधी द्यायची, याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात हर्षलच्या जागी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

वाचा-जसप्रीत बुमराबाबत राहुल द्रविड यांनी दिली गूड न्यूज, म्हणाले वर्ल्डकपच्या संघात तर तो...

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली होती. अर्शदीप सिंग आणि दीपक चहरने अचूक गोलंदाजी केली होती. त्यामुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीत एक बदल होऊ शकतो, तर फलंदाजीमध्येही एक बदल होणार असल्याचे दिसत आहे. कारण दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने विजय साकारला तर नक्कीच त्यांना मालिका जिंकता येणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना महत्वाचा असेल. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी कसा संघ निवडला जातो आणि कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज