अ‍ॅपशहर

IND vs SA : भारताच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा गरबा, पहिल्या सामन्यात उडवला खुर्दा

IND vs SA : भारताने पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फे फे उडवल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कारण पहिल्याच सामन्यात भारताने आफ्रिकेच्या फलंदाजांना लवकरच तंबूचा रस्ता दाखवला. अर्शदीपने तर पहिल्याच षटकात तीन बळी मिळवले. चहरने यावेळी अजून दोन बळी मिळवले आणि त्यांचा अर्धा संघ गारद झाला.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 28 Sep 2022, 8:43 pm
थिरुअनंतपुरम : भारताने पहिल्यात सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा चांगलेच नाचवले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ गारद केला होता. त्यावेळी त्यांची ५ बाद ९ अशी अवस्था होती. पण त्यानंतर एडन मार्करम आणि वेन पार्नेल यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केशव महाराजने ४१ धावांची खेळी साकारल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला शतकाची वेस ओलांडता आली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला यावेळी भारतापुढे १०७ धावांचे आव्हान ठेवता आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs sa
सौजन्य-ट्विटर


चहरने पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला आणि पहिल्या सलामीवीराला तंबूत धाडले. पण त्यानंतर दुसऱ्या षटकात तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची संपूर्ण हवाच निघून गेली. कारण दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डीकॉकला बाद केले आणि भारताला दुसरे यश मिळवून दिले. अर्शदीप फक्त या एका विकेटवर थांबला नाही. या षटकात अजून दोन विकेट्स त्याने मिळवले.

अर्शदीपने दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिली सोरोवला बाद केले. अर्शदीप यावर फक्त थांबला नाही. त्याने या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ८ अशी दयनीय अवस्था केली. अर्शदीपने सलग दोन विकेट्स काढल्या, त्यामुळे पुढच्या षटकातच्या पहिल्या चेंडूवर त्याला ह्रट्रीक मिळवण्याची संधी होती. पण भारतीय संघ फक्त या एकाच गोष्टीवर थांबला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातही भारतीय संघाला यश मिळाले.

यावेळी तिसरे षटक हे पुन्हा टाकण्यासाठी दीपक चहर आला. दीपकने या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्रिस्टन स्टब्लला बाद केले आणि आफ्रिकेला यावेळी पाचवा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ यावेळी गारद झाला आणि त्यांना फक्त ९ धावा करता आल्या होत्या. पण हा दक्षिण आफ्रिकेचा जगभरातील निच्चांक होता. कारण आतापर्यंत कोणत्याही संघाला २.३ षटकांमध्ये कोणत्याही संघाने पाच विकेट्स गमावलेल्या नाहीत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाबाबत ही लाजीरवाणी गोष्ट होती. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेचा संघ किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख