अ‍ॅपशहर

करायचा होता तर एखादा चांगला रेकॉर्ड करायचा; ऋषभ पंतने पाहा काय केले

Rishabh Pant News: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचा दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभव झाला. द.आफ्रिकेने ही लढत ४ विकेटनी जिंकली आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2022, 9:01 am
कटक: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी मोठ्या आशेने ऋषभ पंतला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी पंतकडे आली होती. या निमित्ताने पंतला स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची संधी देखील होती. पण प्रत्यक्षात असे झाले नाही. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन लढतीत भारताचा पराभव झालाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rishabh pant
ऋषभ पंत


भारताच्या सलग दुसऱ्या पराभवामुळे पंतच्या नावावर एक असा नकोसा विक्रम जमा झालाय जो त्याला कधीच लक्षात ठेवावासा वाटणार नाही. पंत भारताचा असा पहिला कर्णधार झालाय ज्याच्या नेतृत्वाखाली पहिल्या दोन टी-२० सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. याआधी विराट कोहलीने त्याच्या पहिल्या टी-२० सामन्यात पराभव स्विकारला होता. आता पंतने विराटला मागे टाकले.

वाचा- 'सचिन, द्रविड, अझहरशी कधीच स्पर्धा केली नाही'; असं कोण, का म्हणालं जाणून घ्या...

टीम इंडियाला असे देखील कर्णधार मिळाले आहेत ज्यांनी पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवला. यात विरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे, केएल राहुल आणि सुरेश रैना यांचा समावेश आहे. महेंद्र सिंह धोनीने कर्णधार म्हणून पहिली मॅच स्कॉटलंडविरुद्ध खेळली होती. पण ती लढत पावसामुळे रद्द झाली होती, त्यानंतरच्या मॅचमध्ये धोनीने विजय मिळून दिला होता.

वाचा- IPL मीडिया राइट्स लिलावाचा पहिला दिवस; डिजिटल आणि टीव्ही हक्कांसाठी बोली 100 कोटींच्या घरात

दुसऱ्या टी-२० सामन्यात द.आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने २० षटकात ६ बाद १४८ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ४०, ईशान किशनने ३४ तर दिनेश कार्तिकने ३० धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल द.आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. पॉवर प्लेमध्ये ३ बाद २९ धावा करणाऱ्या आफ्रिकेला कर्णधार टेंबा बावुआ आणि क्लासेन यांनी सावरले. आफ्रिकेने १० चेंडू आणि ४ विकेट राखून विजय मिळवला.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख