अ‍ॅपशहर

किंग कोहली नंबर वन आशियाई कर्णधार; सौरव गांगुलीचा विक्रम मोडला

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने ७९ धावांची खेळी केली. अर्धशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार कोहलीशिवाय इतर भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 12 Jan 2022, 1:32 pm
केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने ७९ धावा केल्या. २०२२ मध्ये खेळलेला हा त्याचा पहिलाच डाव होता आणि गेल्या २ वर्षातील सर्वात मोठी खेळीही ठरली. नक्कीच केपटाऊनमध्ये विराटचे शतक हुकले, पण एक मोठा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs sa virat kohli surpasses sourav ganguly among most runs by asian captains in south africa
किंग कोहली नंबर वन आशियाई कर्णधार; सौरव गांगुलीचा विक्रम मोडला


वाचा- ऑस्ट्रेलियाने स्वप्नात देखील विचार केला नसेल; टीम इंडियाने केली मजबूत धुलाई

विराट कोहलीने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात ७९ धावा करत सौरव गांगुलीचा विक्रम मोडला. हा विक्रम तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आशियाई कर्णधाराशी संबंधित आहे. विराट आता या बाबतीत नंबर वन बनला आहे. सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट एकूण ९११ धावा केल्या होत्या. आता विराट कोहलीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराटने आता आफ्रिकेच्या भूमीवर क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये १००३ धावा केल्या आहेत.

वाचा- प्रत्येक वर्षी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच; पाहा कधी आणि कुठे

या बाबतीत विराट आणि गांगुलीनंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाचा क्रमांक लागतो. तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रणतुंगाने दक्षिण आफ्रिकेत ६७४ धावा केल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचाच माजी कर्णधार सनथ जयसूर्या आहे, त्याने दक्षिण आफ्रिकेत ६३७ धावा केल्या आहेत. धोनीने दक्षिण आफ्रिकेत सर्व फॉरमॅटमध्ये ५९२ धावा केल्या आहेत. आणि तिथे सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.

वाचा- पॉर्नस्टारने केला मोठा खुलासा; या खेळाडूंसोबत संबंध ठेवण्यास आवडतात

दरम्यान, या दोन्ही देशातील तिसरी आणि निर्णायक कसोटी मंगळवारपासून (११ जानेवारी) सुरू झाली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय संघाला पहिल्या डावात फक्त २२३ धावांपर्यंतच मजल मारता आली. यात कर्णधार कोहलीचे सर्वाधिक ७९ धावांचे योगदान होते.

वाचा- तिसऱ्या कसोटीचा पहिला डाव सुरू असताना विराटबद्दल सुनील गावस्कर हे काय बोलून गेले!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज