नवी दिल्ली: रविवारी भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात ३-० असा विजय मिळवला. या विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सलग १२वा विजय मिळून विश्व विक्रमाची बरोबरी केली. आता यजमान भारत श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. तो प्रथमच कसोटीचा नियमीत कर्णधार म्हणून सूत्रे हाती घेईल.
वाचा- सूर्यकुमार आणि श्रेयस म्हणजे मोठी डोकेदुखी; कर्णधार रोहित शर्मा असे का म्हणाला...
चार मार्चपासून होणाऱ्या पहिल्या कसोटीपासून संघातील मधळ्या क्रमातील नव्या युगाची सुरूवात होऊ शकते. कर्णधार रोहित शर्मा मधळ्या फळीत शुभमन गिल, हनुमा विहारी या खेळाडूंना चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या ठिकाणी संधी देईल असे दिसते. भारतीय संघ व्यवस्थापनाने हे स्पष्ट केले आहे की रहाणे आणि पुजार यांना लंकेविरुद्धच्या दोन आणि नंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एका कसोटी सामन्यात संधी दिली जाणार नाही. त्यामुळे आगामी ३ कसोटीत विहारी आणि गिल हे दोन पर्याय असतील. तर श्रेयस अय्यरला बॅकअपच्या स्वरुपात ठेवले जाईल.
वाचा- रशियाला आणखी एक धक्का; फिफा विश्वचषक खेळण्यास ५ देशांनी दिला नकार
भारताने केपटाऊन येथे अखेरची कसोटी मॅच खेळली होती. त्या संघातील दोन जागा आता रिक्त आहेत. आता विरटा कोहली जेव्हा मोहालीत त्याचा १००वा कसोटी सामना खेळले तेव्हा ३ खेळाडू संघातील स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. या स्थानावर गेल्या दशकापासून पुजारा आणि रहाणे यांचे वर्चस्व होते. आता रोहित शर्मा समोर सर्वात मोठा प्रश्न हा असेल की, गिल, विहारी आणि अय्यर हे तिनही खेळाडू फिट असतील तर कोणाला बाहेर बसवायचे. गिल आता फिट झाला असून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याला मधळ्या फळीत संधी देऊ शकतात. रोहित आणि मयांक या सलामीच्या जोडीनंतर गिलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते.
वाचा- रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांची हकालपट्टी; युक्रेनवर हल्ला केल्याने बसला पहिला दणका
पहिली कसोटी भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, रविंचंद्रन अश्विन किंवा जयंत यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
वाचा- सूर्यकुमार आणि श्रेयस म्हणजे मोठी डोकेदुखी; कर्णधार रोहित शर्मा असे का म्हणाला...
चार मार्चपासून होणाऱ्या पहिल्या कसोटीपासून संघातील मधळ्या क्रमातील नव्या युगाची सुरूवात होऊ शकते. कर्णधार रोहित शर्मा मधळ्या फळीत शुभमन गिल, हनुमा विहारी या खेळाडूंना चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या ठिकाणी संधी देईल असे दिसते. भारतीय संघ व्यवस्थापनाने हे स्पष्ट केले आहे की रहाणे आणि पुजार यांना लंकेविरुद्धच्या दोन आणि नंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एका कसोटी सामन्यात संधी दिली जाणार नाही. त्यामुळे आगामी ३ कसोटीत विहारी आणि गिल हे दोन पर्याय असतील. तर श्रेयस अय्यरला बॅकअपच्या स्वरुपात ठेवले जाईल.
वाचा- रशियाला आणखी एक धक्का; फिफा विश्वचषक खेळण्यास ५ देशांनी दिला नकार
भारताने केपटाऊन येथे अखेरची कसोटी मॅच खेळली होती. त्या संघातील दोन जागा आता रिक्त आहेत. आता विरटा कोहली जेव्हा मोहालीत त्याचा १००वा कसोटी सामना खेळले तेव्हा ३ खेळाडू संघातील स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. या स्थानावर गेल्या दशकापासून पुजारा आणि रहाणे यांचे वर्चस्व होते. आता रोहित शर्मा समोर सर्वात मोठा प्रश्न हा असेल की, गिल, विहारी आणि अय्यर हे तिनही खेळाडू फिट असतील तर कोणाला बाहेर बसवायचे. गिल आता फिट झाला असून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याला मधळ्या फळीत संधी देऊ शकतात. रोहित आणि मयांक या सलामीच्या जोडीनंतर गिलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते.
वाचा- रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांची हकालपट्टी; युक्रेनवर हल्ला केल्याने बसला पहिला दणका
पहिली कसोटी भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, रविंचंद्रन अश्विन किंवा जयंत यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज