हैदराबाद: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात रंगलेल्या टी-२० सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजवर सहा विकेट राखून विजय मिळवला. पाहुण्या संघानं प्रथम फलंदाजी करताना २०७ धावांचा डोंगर उभा केला होता. विराट कोहलीच्या ९४ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारतानं हे लक्ष्य सहज गाठलं. विराट सामनावीर ठरला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं १२ वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. यासह त्यानं विश्वविक्रमाशी बरोबरी केली.
भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या वेस्टइंडीज संघावर ६ विकेट राखून सहज मात केली. कर्णधार विराट कोहलीची नाबाद ९४ धावांची खणखणीत खेळी आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विंडीजचे २०८ धावांचे मोठे आव्हान १८.४ षटकांत सहज पार केले. भारताने ४ विकेटच्या मोबदल्यात २०९ धावा करत विजय साकारला व मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विराटनं या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार ठोकले. विराट सामनावीराचा मानकरी ठरला.
क्लब क्रिकेटच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद
हैदराबादमध्ये विराट सुस्साट; विंडीजचा धुव्वा
विश्वविक्रमाशी बरोबरी
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं १२ वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या पुरस्कारासह सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीच्या नावावर हा विक्रम होता. याबाबतीत दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा अष्टपैलू शाहीद आफ्रिदी आहे. त्यानं ११ वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.
शास्त्रींशी तणावपूर्ण संबंध ही अफवा: गांगुली
रोहित नवव्यांदा ठरला सामनावीर
भारतीय क्रिकेटपटूंच्या बाबतीत म्हणाल तर, हिटमॅन रोहित शर्मा नऊ वेळा सामनावीराचा मानकरी ठरला आहे. त्यानंतर युवराज सिंहचा क्रमांक लागतो. त्यानं ५८ सामन्यांत सात वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.
कोहलीची सर्वोच्च खेळी
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात कोहलीनं तुफानी खेळी केली. अवघ्या ५० चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीनं नाबाद ९४ धावांची खेळी केली. ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी ९० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्यानं राहुलसोबत १०० धावांची भागीदारी रचली. त्यामुळं २०७ धावांचं आव्हान सहज पार करता आलं. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं विक्रमी विजय मिळवला आहे.
भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या वेस्टइंडीज संघावर ६ विकेट राखून सहज मात केली. कर्णधार विराट कोहलीची नाबाद ९४ धावांची खणखणीत खेळी आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विंडीजचे २०८ धावांचे मोठे आव्हान १८.४ षटकांत सहज पार केले. भारताने ४ विकेटच्या मोबदल्यात २०९ धावा करत विजय साकारला व मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विराटनं या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार ठोकले. विराट सामनावीराचा मानकरी ठरला.
क्लब क्रिकेटच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद
हैदराबादमध्ये विराट सुस्साट; विंडीजचा धुव्वा
विश्वविक्रमाशी बरोबरी
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं १२ वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या पुरस्कारासह सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीच्या नावावर हा विक्रम होता. याबाबतीत दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा अष्टपैलू शाहीद आफ्रिदी आहे. त्यानं ११ वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.
शास्त्रींशी तणावपूर्ण संबंध ही अफवा: गांगुली
रोहित नवव्यांदा ठरला सामनावीर
भारतीय क्रिकेटपटूंच्या बाबतीत म्हणाल तर, हिटमॅन रोहित शर्मा नऊ वेळा सामनावीराचा मानकरी ठरला आहे. त्यानंतर युवराज सिंहचा क्रमांक लागतो. त्यानं ५८ सामन्यांत सात वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.
कोहलीची सर्वोच्च खेळी
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात कोहलीनं तुफानी खेळी केली. अवघ्या ५० चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीनं नाबाद ९४ धावांची खेळी केली. ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी ९० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्यानं राहुलसोबत १०० धावांची भागीदारी रचली. त्यामुळं २०७ धावांचं आव्हान सहज पार करता आलं. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं विक्रमी विजय मिळवला आहे.