अ‍ॅपशहर

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारतीय संघात दोन मोठे बदल, पाहा कोणाला संधी मिळणार...

Team India : यापूर्वी शिखर धवनकडे कर्णधारपद होते, तर राहुल द्रविड हे संघाचे प्रशिक्षक होते. पण या दौऱ्यासाठी आता लोकेश राहुलला कर्णधारपद देण्यात आले आहे, तर भारताचे प्रशिक्षकपद हे व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे असेल. त्यामुळे या मालिकेत बरेच बदल आपल्याला पाहायला मिळू शकतील. पहिल्या सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 17 Aug 2022, 5:31 pm
नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या दौऱ्यासाठी कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यामध्ये यापूर्वीच बदल करण्यात आले आहेत. पण पहिल्या सामन्यासाठी संघातही मोठा बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम team india


पहिला बदल...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यर हा संघात होता आणि या मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत तिसऱ्या स्थानावर कोणता फलंदाज पाठवायचा, याचा विचार भारतीय संघाला करावा लागणार आहे. या संघात तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्यासाठी भारतीय संघापुढे दोन पर्याय असतील. तिसऱ्या स्थानावर एक तर सलामीवीर ऋतुराज गायकवाडला संधी दिली जाऊ शकते. सलामीला जर शिखर धवन आणि शुभमन गिल आहे तर ऋतुराजला संधी देण्याचा हा एक चांगला पर्याय असेल. तिसऱ्या स्थानासाठी राहुल त्रिपाठी हा दुसरा पर्याय असू शकतो. यापूर्वी राहुलने चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे या दोघांपैकी कोणाला संधी मिळते,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

वाचा-भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामने कुठे लाइव्ह पाहता येतील, जाणून घ्या चॅनेल

दुसरा बदल
फलंदाजीमध्ये अजून एक मोठा बदल भारतीय संघात होऊ शकतो. चौथ्या स्थानावर कोणता खेळाडू खेळवायचा हा प्रश्न देखील आता भारताच्या संघापुढे असेल. कारण या स्थानावर सूर्यकुमार यादव हा चपखल बसत होता. पण या मालिकेसाठी सूर्यकुमारलाही विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता चौथ्या स्थानावर कोणाला संधी द्यायची, याचा विचार सुरु आहे. पण चौथ्या स्थानासाठी आता कर्णधार लोकेश राहुलला पाठवले जाऊ शकते. कारण राहुल सलामीला येऊ शकत नाही. पण जर तो चौथ्या स्थानावर फलंदाजीला आता तर संघाचा चांगला समतोल राखता येऊ शकतो. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी राहुलसारखा दुसरा पर्याय सध्याच्या घडीला तरी दिसत नाही.

भारतीय संघ यापूर्वी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी शिखर धवनकडे कर्णधारपद होते, तर राहुल द्रविड हे संघाचे प्रशिक्षक होते. पण या दौऱ्यासाठी आता लोकेश राहुलला कर्णधारपद देण्यात आले आहे, तर भारताचे प्रशिक्षकपद हे व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे असेल. त्यामुळे या मालिकेत बरेच बदल आपल्याला पाहायला मिळू शकतील.

भारतीय संघ : लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (यष्टीरक्षक) शार्दुल ठाकुर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज नदीम.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज