अ‍ॅपशहर

भारताने विजय साकारला खरा पण रोहित शर्मावर आली नामुष्कीची वेळ, पाहा नेमकं काय घडलं...

Rohit Sharma: ​​भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली खरी. पण कर्णधार रोहित शर्मावर यावेळी नामुष्की ओढवल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात रोहितच्या नावावर नकोसा विक्रम जाहीर झाला आहे. भारताच्या विजयानंतरही रोहितवर कोणती नामुष्की ओढवली आणि त्याच्या नावावर आता कोणता नकोसा विक्रम झाला आहे, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 29 Sep 2022, 10:55 am
थिरुवनंतपुरम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने दमार विजय साकारला. पण या विजयानंतरही रोहित शर्मावर नामुष्की ओढवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चाहत्यांच्या या आनंदात मीठाचा खडा पडल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs sa
सौजन्य-ट्विटर


भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली खरी. पण कर्णधार रोहित शर्मावर यावेळी नामुष्की ओढवल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात रोहितच्या नावावर नकोसा विक्रम जाहीर झाला आहे. आजच्या सामन्यात गोलंदाजांनी कमाल केली. चेंडू चांगला स्विंग होत होता आणि त्याचा चांगलाच फायदा अर्शदीप सिंग व दीपक चहर यांनी उचलला. पण रोहित शर्माने मात्र या सामन्यात निराश केले. कारण कोणत्याही भारतीय खेळाडूच्या नावावर नाही, असा विक्रम आता रोहितच्या वाट्याला आला आहे.

आजच्या सामन्यात रोहित हा फक्त दोन चेंडू खेळला. या दोन चेंडूंमध्ये त्याला एकही धाव करता आली नाही. कागिसो रबाडाने यावेळी त्याला शून्यावर बाद केले आणि त्याला भोपळाही फोडता आला नाही. पण रोहितच्या नावावर आता सर्वाधिक शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम झाला आहे. भराताकडून सर्वाधिक भोपळे हे रोहितच्या नावावर आहेत. कारण आता तो नऊ वेळा शून्यावर बाद झाला आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भराताकडून सर्वात जास्तवेळी शून्यावर बाद होणायाचा नकोसा विकम रोहितच्या नावावर झाला आहे. त्याचबरोबर भारताचा कर्णधार म्हणूनही सर्वाधिक शून्यावर रोहित बाद झाला आहे. रोहित कर्णधार म्हणून तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे, कोहलीदेखील तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. पण यापुढे कोहलीकडे नेतृत्व जाणार नाही, त्यामुळे रोहितच या नकोशा विक्रमाच्या यादीत पहिल्या स्थानावर असेल.

रोहितमुळे भारताची सुरुवात चांगली झाली नाही. दक्षिण आफ्रिकेचे १०७ धावांचे आव्हान माफक होते. पण तरीही भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. रोहित शर्मा यावेळी शून्यावर बाद झाला, त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर फलंदजीला आलेल्या विराट कोहलीलाही फक्त तीन धावा करता आल्या. त्यावेळी भारताची २ बाद १७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे समीकरणच बदलून टाकले.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज