अ‍ॅपशहर

अखरेच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर भारताचा विजय, आयर्लंडने चांगलेच नाचवले

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात तर दीपकने वादळी फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर दीपकने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावले. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा चौथा खेळाडू ठरला. दीपकने यावेळी ५७ चेंडूंत ९ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर १०४ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. त्यामुळेच भारताला दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात आयर्लंडपुढे २२५ धावांचा डोंगर उभारता आला.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 29 Jun 2022, 12:44 am
डब्लिन : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर भारताने बाजी मारली. भारताने आयर्लंडपुढे विजयासाठी २२६ धावांचे आव्हान ठेवले होते आणि आयर्लंडला विजयासाठी एका चेंडूंत ६ धावांची गरज होती. पण त्यांना एकच धाव काढता आली आणि भारताला चार धावांनी विजय मिळवता आला. या विजयासह भारताने ही मालिका २-० अशी जिंकली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भारत (सौजन्य-ट्विटर)

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने २२८ धावांचा डोंगर उभारला असला तरी त्यांना आयर्लंडने कडवी लढत दिल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्यामुळे दीपक हुडाला सलामीला पाठवले आणि त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात तर दीपकने वादळी फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर दीपकने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावले. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा चौथा खेळाडू ठरला. दीपकने यावेळी ५७ चेंडूंत ९ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर १०४ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. दीपकला यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत संजू सॅमसनने सुयोग्य साथ दिली. दीपक आणि संजू यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताला दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात आयर्लंडपुढे २२५ धावांचा डोंगर उभारता आला. पण आयर्लंडच्या संघाने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत अखेरच्या षटकांपर्यंत रंगत कायम ठेवली. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली होती.

आयर्लंडच्या संघाकडून यावेळी पॉल स्टर्लिंग आणि अँडी बॅरबेनी यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी यावेळी संघासाठी ७२ धावांची सलामी दिली. पॉलने यावेळी १८ चेंडूंत ४० धावांची खेळी साकारली, तर अँडीने ३७ चेंडूं ६० धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर आयर्लंडच्या हातून सामना निसटेल, असे वाटले होते. पण त्यावेळी जॉर्ज डॉकरेलने फटकेबाजी सुरु करत भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.

भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली. दीपक आणि संजू यांची चांगलीच जोडी जमल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची मोठी भागदारी रचली. ही भागीदारी सुरु असतानाच भारतीय संघ या सामन्यात मोठी धावसंख्या उभारणार हे स्पष्ट झाले होते. पण संजू बाद झाला आणि ही जोडी फुटली. संजूने या सामन्यात पुनरागमन करताना धमाकेदार फटकेबाजी केली. संजूने यावेळी ४२ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७७ धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळेच भारताला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख