कोलंबो : भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभवाचा धक्का बसला. श्रीलंकेने या सामन्यात भातीय संघापुढे विजयासाठी २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पण दीपक चहरने अर्धशतक झळकावत भारताला सामना जिंकवून दिला. भारतीय संघ हा सामना हरणार, असे काही जणांना वाटत होते. पण चहरच्या अर्धशतकाने संघात संजीवनी आणली आणि संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या विजयासाह भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे, त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यातील विजयासह मालिकाही खिशात टाकली आहे. चहरने या सामन्यात सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ६९ धावा फटकावल्या आणि भारतीय संघाच्या विजयावर शिक्कानोर्तब केले. चहरचे हे पहिलेच अर्धशतक ठरले आहे. चहरने या सामन्यात फलंदाजीबरोबर चांगली गोलंदाजीही केली. त्यामुळे दीपक चहरला यावेळी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. गेल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणारे पृथ्वी शॉ आणि इशान किशन यांना यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पृथ्वीला यावेळी १३ आणि इशानला यावेळी फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागले. हे दोघए बाद झाल्यावर संघाची जबाबदारी कर्णधार शिखर धवनवर आली होती. पण गेल्या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावणारा धवन यावेळी २९ धावांवर बाद झाला. मनीष पांडेदेखील यावेळी सलग दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
भारताची ५ बाद ११६ अशी अवस्था झाली होती, त्यावेळी सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्या यांनी चांगली भागीदारी रचत संघाला सावरले. सूर्यकुमारने यावेळी चौकारासह अर्धशतकही साकारले. ही जोडी आता संघाला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण अर्धशतक झळकावल्यावर सूर्यकुमार यादवला जास्त धावा करता आल्या नाहीत आणि तो पायचीत होऊन तंबूत परतला. सूर्यकुमारने यावेळी ४४ चेंडूंत सहा चौकाराच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार बाद झाल्यावर कृणालने काही काळ संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये तो अपयशी ठरला. पंड्याला यावेळी ३५ धावा करता आल्या. भारताची त्यावेळी ७ बाद १९३ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर दीपक चहरने अर्धशतक झळकावत संघासाठी महत्वाची कामगिरी केली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्यासाठी आज योग्य ठरला. श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडोने यावेळी ५० धावांची खेळी साकारली, तर चरिथ असालंकाने ६५ धावांची सर्वाधिक खेळी साकारली.
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. गेल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणारे पृथ्वी शॉ आणि इशान किशन यांना यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पृथ्वीला यावेळी १३ आणि इशानला यावेळी फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागले. हे दोघए बाद झाल्यावर संघाची जबाबदारी कर्णधार शिखर धवनवर आली होती. पण गेल्या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावणारा धवन यावेळी २९ धावांवर बाद झाला. मनीष पांडेदेखील यावेळी सलग दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
भारताची ५ बाद ११६ अशी अवस्था झाली होती, त्यावेळी सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्या यांनी चांगली भागीदारी रचत संघाला सावरले. सूर्यकुमारने यावेळी चौकारासह अर्धशतकही साकारले. ही जोडी आता संघाला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण अर्धशतक झळकावल्यावर सूर्यकुमार यादवला जास्त धावा करता आल्या नाहीत आणि तो पायचीत होऊन तंबूत परतला. सूर्यकुमारने यावेळी ४४ चेंडूंत सहा चौकाराच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार बाद झाल्यावर कृणालने काही काळ संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये तो अपयशी ठरला. पंड्याला यावेळी ३५ धावा करता आल्या. भारताची त्यावेळी ७ बाद १९३ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर दीपक चहरने अर्धशतक झळकावत संघासाठी महत्वाची कामगिरी केली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्यासाठी आज योग्य ठरला. श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडोने यावेळी ५० धावांची खेळी साकारली, तर चरिथ असालंकाने ६५ धावांची सर्वाधिक खेळी साकारली.