अ‍ॅपशहर

वेस्ट इंडिजवर दणदणीत विजयासह भारताने मालिका जिंकली, रोहित शर्माने रचला मोठा विक्रम

रोहित शर्माने भारताचे कर्णधारपद स्विकारल्यावर संघाला एकामागून एक विजय मिळत आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्येही मालिका जिंकली होती आणि आता वेस्ट इंडजवरही भारताने मालिका विजय साकारला आहे. रोहित शर्माने आजच्या सामन्यात भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली. रोहितने १६ चेंडूंत ३३ धावांची वादळी खेळी साकारली. त्यानंतर रिषभ पंत, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांच्याकडून धमाकेदार फटकेबाजी पाहायला मिळाली.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 7 Aug 2022, 1:02 am
फ्लोरिडा : भारताने चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय साकारला. या सामन्यातील विजयासह भारताने ही पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली आहे. या मालिका विजयासह भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम रचला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Sharma


रोहित शर्माने भारताचे कर्णधारपद स्विकारल्यावर संघाला एकामागून एक विजय मिळत आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्येही मालिका जिंकली होती आणि आता वेस्ट इंडजवरही भारताने मालिका विजय साकारला आहे. भारताचा हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील आठवा विजय आहे. या विजयानंतर भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली थेट पाकिस्तानशी दोन हा करायाल आशिया चषक स्पर्धेत उतरणार आहे.

चौथ्या सामन्यात भारतीय संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. रोहित शर्माने आजच्या सामन्यात भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली. रोहितने १६ चेंडूंत ३३ धावांची वादळी खेळी साकारली. त्यानंतर रिषभ पंत, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांच्याकडून धमाकेदार फटकेबाजी पाहायला मिळाली. रोहित बाद झाल्यावर पंत आणि संजू या दोघांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पंतने यावेळी ३१ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर ४४ धावांची सर्वाधिक खेळी साकारली. पंतला यावेळी संजूची चांगली साथ मिळाली. संजूनेही भन्नाटट फटकेबाजी करताना २३ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३० धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये अक्षर पटेलने दमदार फटकेबाजी केली. अक्षरने आपल्यातील अष्टपैलू खेळाडू पुन्हा एकदा दाखवून दिला. अक्षरने यावेळी फक्त आठ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटाकाराच्या जोरावर नाबाद २० धावांची खेळी साकारली, यावेळी अक्षरचा स्ट्राइक रेट २५० एवढा होता. या सुरेख फटकेबाजीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत असताना १९१ धावांचा डोंगर रचला.

भारताच्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत आसताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. भारताच्या अर्शदीप सिंग, अवेश खान आणि अक्षर पटेल या युवा गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजचा डाव १३२ धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना ५९ धावांनी जिंकला.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख