अ‍ॅपशहर

पराभवानंतर भारताला बसला सर्वात मोठा धक्का, कमावलं होतं ते सर्व गमावण्याची आली पाळी

BIG LOSS TO INDIA : भारताने तिसरा वनडे सामना गमावला व त्यांच्या हातून मालिका निसटली. पण हा सामना संपला आणि भारतीय संघाला अजून एक मोठा धक्का बसला. सामना संपला आणि भारतासाठी ही बॅड न्यूज आल्याचे पाहायला मिळाले. भारताला सामना संपल्यावर नेमका कोणता मोठा धक्का बसला आहे ते आता जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 22 Mar 2023, 10:55 pm
नवी दिल्ली : तिसऱ्या वनडेत भारताला पराभवचा धक्का बसला. पण यापेक्षा मोठा धक्का भारताला सामना संपल्यावर बसला आहे. कारण भारतीय संघाने जे आतापर्यंत मेहनतीनं कमावलं होतं, ते गमावण्याची पाळी आता त्यांच्यावर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit sharma
सौजन्य-पीटीआय


तिसऱ्या सामन्यात भारताला २७० धावांची गरज होती. भारताला या सामन्यात सुरुवात चांगली मिळाली होती. रोहित आणि शुभमन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. पण रोहित ३० आणि गिल ३७ धावांवर बाद झाले आणि भारताला दुहेरी धक्के बसले. पण त्यानंतर विराट कोहलीने संघाचा डाव सावरला होता. कोहलीने अर्धशतकही पूर्ण केले. त्यामुळे हा सामना भारतीय संघ जिंकेल, असे वाटत होते. पण एक मोठा फटका मारताना कोहली बाद झाला आणि त्यामुळे हा सामना फिरला. कोहली बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने चांगलीच कंबर कसली आणि त्यांनी भारताला विजयापासून परावृत्त केले. पण या पराभवानंतर भारतीय संघाने आपला ताज गमावला आहे.

हा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ हा आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. पण या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि त्याचा मोठा फटका त्यांना बसला आहे. कारण या पराभवानंतर त्यांचे अव्वल स्थान हिरवले गेले आहे. भारताला पराभवामुळे आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे. आता भारताकडून हे अव्वल स्थान ऑस्ट्रेलियाने पटकावले आहे. कारण आता ऑस्ट्रेलियाच्या संघाचे या क्रमवारीत ११३ गुण झाले आहेत. या क्रमवारीत भारताचेही ११३ गुण झाले आहेत. पण ऑस्ट्रेलियाने भारतापेक्षा कमी सामने खेळले आहेत आणि त्याचा फायदा त्यांना झाला आहे. ऑस्ट्रेलियाने ३५ सामन्यांमध्ये ११३ गुण पटकावले आहे आणि हेच ११३ गुण कमावण्यासाठी भारताला ४७ सामने खेळावे लागले आहेत. त्यामुळे कमी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने जास्त गुण कमावले आहेत आणि त्यामुळेच त्यांना अव्वल स्थान आयसीसीने दिले आहे.

भारताने बऱ्याच मेहनतीने हे अव्वल स्थान कमावले होते. पण भारताला या मालिकेत पराभव पत्करावा लागला. सलग दोन सामने त्यांनी गमावले आणि त्यामुळे त्यांचे अव्वल स्थान हिरवले गेले आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख