१० विकेटनी पराभव
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा १० विकेटनी पराभव झाला. आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत ७ सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा न्यूझीलंडने पराभव केला. भारताने न्यूझीलंडसमोर ९ धावांचे लक्ष्य दिले होते जे त्यांनी दुसऱ्या षटकात पार केले.
फलंदाज अपयशी
पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी फक्त १६५ धावा केल्या. सामना झाल्यानंतर कोहलीने मान्य केली ही पहिल्या डावात जर २२०-२३० पर्यंत धावसंख्या केली असतील तर बरे झाले असते. दुसऱ्या डावात देखील भारतीय संघाला १९१ धावा करता आल्या. दोन्ही डावात भारताला २०० पर्यंत पोहोचता आला नाही. रोहित शर्माच्या जागी पृथ्वी शॉला संधी मिळाली पण तो प्रभाव पाडू शकला नाही. पुजारा, कोहली अपयशी ठरले. मयांक आणि अजिंक्य राहणे यांनीच थोड्या धावा केल्या.
कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह
माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भारताने सामन्यात न्यूझीलंडवर दबाव ठेवला नाही. नव्या चेंडूचा कोहलीला वापर करता आला नाही. दिवसाच्या सुरूवातीला त्याने जलद गोलंदाजांकडून अनेक ओव्हर टाकून घ्यायच्या होत्या. पण चौथ्या ओव्हरनंतर त्याने अश्विनला गोलंदाजी दिली.
तळातील फलंदाजांनी केल्या धावा
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना दबावात ठेवले. त्यांच्या सात विकेट २२५ धावांवर गेल्या होत्या. पण त्यानंतर न्यूझीलंडच्या शेवटच्या ३ विकेटनी १२३ धावा केल्या. ९व्या क्रमांकावर आलेल्या जेमिसनने ४४ तर ट्रेंट बोल्टने ३९ धावा केल्या आणि संघाला १८३ धावांची आघाडी मिळून दिली. जर भारताने १०० धावांनी आघाडी कमी केली असतील तर त्याचा फायदा झाला असता.
टॉसचा इफेक्ट
न्यूझीलंडमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचे रेकॉर्ड चांगले आहे. वेलिंग्टनमध्ये जलद आणि उसळी घेणाऱ्या पिचवर न्यूझीलंडने टॉस जिंकला. आणि टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट यांनी परिस्थितीचा भरपूर फायदा घेतला.