अ‍ॅपशहर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाज गेली नाही तर वाचवली; तेव्हा इतक्या धावांवर ऑलआउट झाली होती टीम इंडिया

India Lowest Score In ODI: एकपेक्षा एक दमदार फलंदाज असलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त ११७ धावांवर गारद झाला. दुसऱ्या वनडे सामन्यात त्यांचा १० विकेट्सनी पराभव झाला. चला जाणून घेऊया त्या ७ सामन्यांबद्दल जेव्हा टीम इंडिया १०० चा टप्पा देखील पार करू शकली नव्हती.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2023, 1:02 pm
नवी दिल्ली: भारतीय भूमीवरच टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून १० विकेट्स राखून मानहानीकारक पराभव झाला. विशाखापट्टणम येथे हा दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला होता. हा पराभव भारतीय संघाला नक्कीच बराच काळ आठवण करू देत रहाणार आहे, कारण २०२३चा एकदिवसीय विश्वचषक या वर्षी भारतातच होणार आहे. विश्वचषकाची तयारी करत असताना अशा प्रकारे फलंदाजी बाजू कोलमडली आहे एकही फलंदाज मैदानात जास्त काळ टिकू शकीला नाही. यामुळे आता प्रश्नांचा भडीमार नक्कीच होत आहे. पण ही अशी घटना टीम इंडियासोबत काही पहिल्यांदा घडली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम India Lowest Score In ODI


टीम इंडियाची सर्वात मजबूत मानली जाणारी फलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी अनेकदा ठरली आहे. विशाखापट्टणममध्ये त्यांनी ११७ धावा केल्या होत्या, पण एकदिवसीय इतिहासात असे ७ वेळा घडले आहे; जेव्हा टीम इंडियाने १०० धावांचा आकडाही गाठू शकली नव्हती. कसोटीत त्यांची सर्वात कमी धावसंख्या ३६ धावा आहे, तर एकदिवसीय सामन्यात हा आकडा ५४ धावांचा आहे.

सूर्याला पहिल्याच चेंडूवर दोन वेळा कसं काय आऊट केलं, सामन्यानंतर समोर आली स्टार्कची रणनिती
गांगुलीच्या नेतृत्त्वाखालील संघ ५४ धावांवर ऑल आऊट

२९ ऑक्टोबर २००० रोजी भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळवला जात होता. सौरव गांगुली यावेळेस संघाचा कर्णधार होता. तेव्हा भारतीय संघ केवळ ५४ धावांवर ऑल आऊट झाला होता. या सामन्यात भारताकडून फक्त एका फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला होता. शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघ २६.३ षटकात ऑल आऊट झाला. ही त्यांची वनडे इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे. याशिवाय भारतीय संघ ६३, ७८, ७९, ८८, ९१ आणि ९२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. म्हणजेच ७ प्रसंग असे आले जेव्हा भारत तीन अंकी आकडयापर्यंत पोहोचू शकला नाही.


Video: पाकिस्तानच्या क्रिकेटपटूकडून तिरंग्याचा अपमान; होऊ शकते ३ वर्षाचा तुरुंगवास आणि दंड
पाहूया कोणत्या संघांविरोधात भारताला १०० धावांचा टप्पाही गाठता आला नाही.

भारताची धावसंख्याविरूध्द संघठिकाणकधी
५४ धावाश्रीलंकाशारजाह२९ ऑक्टोबर २०००
६३ धावासिडनी८ जानेवारी १९८१
७८ धावाश्रीलंकाकानपूर२४ डिसेंबर १९८६
७९ धावापाकिस्तान सियालकोट१३ ऑक्टोबर
८८ धावान्यूझीलंडदांबुला१० ऑगस्ट २०१०
९१ धावादक्षिण आफ्रिकाडर्बन२२ नोव्हेंबर २००६
९२ धावान्यूझीलंडहॅमिल्टन३१ जानेवारी २०१९
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख