अ‍ॅपशहर

IND vs SA WWC live : उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला अखेरची संधी, द. आफ्रिकेबरोबर करो या मरो सामना

उपांत्य फेरीसाठीच्या उर्वरित जागेवर कोण विराजमान होणार, याचा निर्णय २७ मार्चला होणार आहे. कारण इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा निकाल उपांत्य फेरीचं तिकीट ठरवेल. तुम्हाला आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मधील एक मनोरंजक सामना पाहायचा असेल, तर तुम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पाहू शकता.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 27 Mar 2022, 12:16 am
ICC Womens World Cup 2022 : ख्राइस्टचर्च : भारताला जर महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे असेल तर त्यांच्यासाठी रविवारी करो या मरो, सामना असेल. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवारी दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. हा सामान जिंकल्यावर भारतीय संघाला उपांत्य फेरीचे दरवाजे खुले होऊ शकतात. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी ही अखेरची संधी असणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india must win match against south africa in icc womens world cup 2022 know points table
IND vs SA WWC live : उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला अखेरची संधी, द. आफ्रिकेबरोबर करो या मरो सामना

दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. रविवारी होणारा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचा नसेल, पण भारतासाठी हा सामना करो वा मरो स्वरुपाचा असेल. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव करून त्यांचा मार्ग रोखण्याचे एकच काम आफ्रिकेपुढे असेल. भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. कारण त्यांची धावगती इंग्लंडपेक्षा कमी आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा फरकाने विजय मिळवावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघाला हा सामना जिंकावा लागेल, नाहीतर त्यांच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा संपुष्टात येतील. त्यामुळे हा सामना पाहण्यासारखा होईल, यात काहीच शंका नाही.

जागा एक, दावेदार तीन
उपांत्य फेरीसाठीच्या उर्वरित जागेवर कोण विराजमान होणार, याचा निर्णय २७ मार्चला होणार आहे. कारण इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा निकाल उपांत्य फेरीचं तिकीट ठरवेल. सध्या टीम इंडिया गुणतालिकेत पाचव्या, तर इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. तिन्ही संघांचे ६-६ गुण आहेत. फरक फक्त धावगती (रनरेट) चा आहे. इंग्लंडची धावगती भारतापेक्षा चांगली आहे आणि भारताची धावगती न्यूझीलंडपेक्षा चांगली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे न्यूझीलंडने साखळी फेरीतील सर्व ७ सामने खेळले आहेत. भारत आणि इंग्लंड यांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना २७ मार्चला होणार आहे.

असा आहे उपांत्य फेरीचा मार्ग
उपांत्य फेरी गाठायची असेल तर भारताला फक्त दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागेल. दक्षिण आफ्रिकेला हरवताच भारत उपांत्य फेरीत पोहोचेल. जरी इंग्लंडने बांग्लादेशला हरवले तरीही त्याचा भारताच्या निकालावर काही परिणाम होणार नाही. दोन्ही संघ ८-८ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचतील.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख