अ‍ॅपशहर

India tour of England 2021 : भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी राहुल द्रवीडचे मोठे वक्तव्य, पाहा काय म्हणाला...

india tour of england 2021 आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघ कसोटी मालिका ३-२ने जिंकू शकतो अशी भविष्यवाणी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रवीड याने केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2021, 11:53 am

हायलाइट्स:

  • भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार
  • या मालिकेत भारताचा ३-२ने विजय होऊ शकतो
  • राहुल द्रवीडने केली भविष्यवाणी
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम टीम इंडिया
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ पुढील काही दिवसात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया प्रथम आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका असेल. या मालिके संदर्भात भारताचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविड याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
वाचा- पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री मदत निधीत पैसे देण्याआधी हा विचार करा, क्रिकेटपटूची पोस्ट व्हायरल

भारतीय संघाच्या आगामी दौऱ्याबद्दल बोलताना राहुल म्हणाला, टीम इंडिया या वर्षी इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांची मालिका ३-२च्या फरकाने जिंकले. इतक नव्हे तर भारतीय संघाकडे २००७ नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी असेल. इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणारा राहुल हा अखेरचा भारतीय कर्णधार होता.

वाचा- विराट आणि रोहित शिवाय भारतीय संघ जाणार या देशाच्या दौऱ्यावर

एका वेबसाइटच्या वेबीनारमध्ये बोलताना राहुल म्हणाला, मला वाटते की भारतीय संघासमोर मालिका जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेल्या राहुल द्रवीडने या मालिकेत आर अश्विन विरुद्ध बेन स्टोक्स ही लढत पाहण्यासारखी होईल असे देखील सांगितले. इंग्लंडच्या गोलंदाजीबाबत कोणतीही शंका नाही. इंग्लंड जलद गोलंदाजी शानदारच असेल. त्यांच्याकडे अनेक चांगले पर्याय आहेत.

वाचा- भारतीय संघाचा इंग्लंड दौरा, कसोटी आणि WTC फायनलचे वेळापत्रक

फलंदाजीबाबत बोलताना राहुल म्हणाला, इंग्लंडचे आघाडीचे सात फलंदाजमध्ये एक जो रूट देखील आहे. त्याच बरोबर ऑलराउंडर बेन स्टोक्स देखील आहे. तो अश्विन विरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. अश्विनने स्टोक्सविरुद्ध भारतात चांगली कामगिरी केली होती आता इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करण्यात तो उत्सुक असेल.

वाचा- कसोटीत ३६व्या वर्षी पदार्पण, पहिल्या ओव्हरमध्ये इतिहास घडवला

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ चांगल्या पद्धतीने तयार असेल असे देखील राहुल म्हणाला. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयाचा आत्मविश्वास असेल. खेळाडूंना स्वत:वर विश्वास असेल. संघातील काही खेळाडू इंग्लंडमध्ये या आधी खेळले आहेत. त्यामुळे भारताची फलंदाजी अनुभवी असेल. या कारणांमुळेच भारतासाठी ही सर्वोत्तम संधी असेल आणि ते मालिका ३-२ने जिंकू शकतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज