अ‍ॅपशहर

IND vs AUS T20I: भारताला मिळाला नवा गोलंदाज, आता ऑस्ट्रेलियाची काही खैर नाही

India vs Australia T20I: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही टी २० मालिका आजपासून (२०सप्टेंबर) सुरू होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघ सामन्यासाठी सराव करताना दिसला. त्यावेळेस भारताचा स्टार फलंदाज देखील गोलंदाजीचा सराव करता होता.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2022, 11:12 am
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला आजपासून ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या सामन्यांसाठी भारतीय संघ देखील सज्ज झाला आहे. आज पहिला सामना हा मोहाली येथे खेळवला जाईल. टीम इंडियाला या मालिकेत सहाव्या किंवा सातव्या गोलंदाजाची उणीव भासू शकते. मात्र, ही उणीव आता क्वचितच भासेल, कारण भारताचा स्टार फलंदाज संघातील सहाव्या किंवा सातव्या गोलंदाजाची उणीव दूर करणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम VK Team India


कोण आहे हा स्टार फलंदाज

हो स्टार फलंदाज म्हणजे भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. आशिया कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे. मंगळवारी होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला या खेळाडूने गोलंदाजीचा जोरदार सराव सुरु केला. पंजाब क्रिकेट असोसिएशनने (PCA) ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये विराट गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.

फायनल मॅच आधी एक निनावी फोन आला आणि भारताने मॅच...; टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचा
भारताचा माजी कर्णधार विराटने मोहालीच्या आयएस वृंद्रा स्टेडियममध्ये जवळपास ३० मिनिटे गोलंदाजीचा सराव केला. यादरम्यान त्याने क्रॉस लेग अॅक्शनने गोलंदाजी केली. कोहलीच्या या सरावामुळे तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत गोलंदाजी करताना दिसणार असल्याचे मानले जात आहे.


सोशल मिडीयावर शेयर केले फोटो

पंजाब क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या इन्स्टाग्रामवर विराटचे गोलंदाजी करताना विविध फोटो शेयर केले. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहीले आहे, 'पाहा उद्या गोलंदाजीची सुरुवात कोण करणार' अनेकांनी यावर कमेंट देखील केली आहे. काहींनी 'व्हिडिओ शेयर करा' म्हटलं आहे तर काही म्हणाले 'भारताचा सहावा गोलंदाजीचा पर्याय' अशा कमेंट केल्या आहेत.

IND vs AUS-सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला पराभवाचं टेन्शन! भारतीय संघामध्ये दाखल भारतीय

View this post on Instagram A post shared by Punjab Cricket Association (@pcacricketassociation)


आशिया कप २०२२ मध्ये गोलंदाजी केली होती

विराटने अलीकडेच आशिया कप २०२२ मध्ये हाँगकाँगविरुद्ध गोलंदाजी केली होती. त्याला ६ वर्षांनंतर टी-२० मध्ये गोलंदाजी केली होती, जिथे त्याने ६ धावांची उत्कृष्ट ओव्हर टाकली. कोहलीने आतापर्यंत १०१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४ बळी घेतले आहेत. कोहलीने २०१६ मध्ये हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी टी-२० सामन्यात गोलंदाजी केली होती.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख