वृत्तसंस्था, नवी दिल्ली
'बांगलादेश संघ आता आम्हाला नमवू शकतो. याला नमविणे असेच म्हणावे लागेल, याला धक्का म्हणता येणार नाही. कारण बांगलादेश संघ आता प्रगल्भ झाला आहे,' असे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. भारत-बांगलादेशदरम्यानच्या मालिकेतील पहिली टी-२० क्रिकेट लढत आज (रविवार) रंगणार आहे. भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे आणि टी-२०त काहीही शक्य आहे, हे गृहीत धरून रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, घरच्या मैदानावर खेळताना भारताचेच पारडे जड असणार आहे. अर्थात, या लढतीवर प्रदूषणाचे मोठे सावट असणार आहे.
भारताची राजधानी दिल्लीतील हवामानाचा दर्जा 'सुमार' या गटात घसरला आहे. दिवाळीनंतर दिल्लीची हवा प्रदूषित झाली आहे. हा इशारा आधीच मिळाला होता. तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिल्लीतील लढत इतरत्र हलविण्याचे टाळले. सध्या दिल्लीत धुक्याचे साम्राज्य आहे. मात्र, अशा हवामानामुळे कुणी दगावणार नाही हे नशीब, अशी बोचरी टीका बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डॉमिंगो यांनी केली होती. बांगलादेशने या प्रदूषणाची तक्रार केलेली नाही. पण, खेळाडूंना आपल्या प्रकृतीची काळजी असणारच आहे.
दुसरीकडे, ही लढत दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी महत्त्वाची असणार आहे. विराट कोहलीने विश्रांती घेतल्यानंतर भारतीय संघाची सूत्रे रोहित शर्माकडे आली आहेत. शिखर धवन पुन्हा संघात परतला आहे. विजय हजारे करंडकमध्ये तो धावांसाठी संघर्ष करताना दिसून आला. त्याला सात सामन्यांत केवळ एकच अर्धशतक ठोकता आले. मधल्या फळीत लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, कृणाल पंड्या असणार आहेत. त्याचबरोबर अष्टपैलू शिवम दुबे याला पदार्पणाची संधी असल्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने दिले आहेत. शिवमच्या समावेशाने मनीष पांडे आणि संजू सॅमसन यांना बाहेर बसावे लागू शकते. खलील अहमद, युजवेंद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर यांची आपापसातच स्पर्धा असेल. म्हणूनच अंतिम अकरा जणांचा संघ निवडताना संघव्यवस्थापनाचा चांगली कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघातील प्रत्येक जण आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचे धोरण संघाने अवलंबिले आहे. कर्णधार रोहित शर्मानेही युवकांना पाठिंबा देणार असल्याचे लढतीपूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
बांगलादेश संघासाठी ही तीन सामन्यांची मालिका आपला आत्मविश्वास उंचाविण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानने चितगावमध्ये बांगलादेशला कसोटीत नमविले. त्यातच भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी बुकीने केलेल्या संपर्काबद्दल आयसीसीला कळविण्यास कसूर केल्याबद्दल शाकीब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. संघाची सूत्रे महमुदुल्लाह रियाद याच्याकडे सोपविण्यात आली आहेत. तेव्हा अशा स्थितीत बांगलादेश संघ भारताला कसा लढा देतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
यातून होणार संघ निवड : भारत - रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, युजवेंद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पंड्या, रिषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर.
बांगलादेश - महमुदुल्लाह रियाद (कर्णधार), तैजुल इस्लाम, महंमद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुश्फिकूर रहीम, अफिफ हुसेन, मोसादेक हुसेन, अमिनूल इस्लाम बिपलोब, अराफत सनी, अब्दू हैदर, अल-अमिन हुसेन, मुस्तफिझूर रहमान, शैफुल इस्लाम.
स्थळ : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
वेळ : सायंकाळी ७ पासून
आमनेसामने
८ टी-२०
८ भारताचे विजय
० बांगलादेशचा विजय
टी-२० क्रमवारी
१ - भारत
९ - बांगलादेश
'बांगलादेश संघ आता आम्हाला नमवू शकतो. याला नमविणे असेच म्हणावे लागेल, याला धक्का म्हणता येणार नाही. कारण बांगलादेश संघ आता प्रगल्भ झाला आहे,' असे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. भारत-बांगलादेशदरम्यानच्या मालिकेतील पहिली टी-२० क्रिकेट लढत आज (रविवार) रंगणार आहे. भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे आणि टी-२०त काहीही शक्य आहे, हे गृहीत धरून रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, घरच्या मैदानावर खेळताना भारताचेच पारडे जड असणार आहे. अर्थात, या लढतीवर प्रदूषणाचे मोठे सावट असणार आहे.
भारताची राजधानी दिल्लीतील हवामानाचा दर्जा 'सुमार' या गटात घसरला आहे. दिवाळीनंतर दिल्लीची हवा प्रदूषित झाली आहे. हा इशारा आधीच मिळाला होता. तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिल्लीतील लढत इतरत्र हलविण्याचे टाळले. सध्या दिल्लीत धुक्याचे साम्राज्य आहे. मात्र, अशा हवामानामुळे कुणी दगावणार नाही हे नशीब, अशी बोचरी टीका बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डॉमिंगो यांनी केली होती. बांगलादेशने या प्रदूषणाची तक्रार केलेली नाही. पण, खेळाडूंना आपल्या प्रकृतीची काळजी असणारच आहे.
दुसरीकडे, ही लढत दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी महत्त्वाची असणार आहे. विराट कोहलीने विश्रांती घेतल्यानंतर भारतीय संघाची सूत्रे रोहित शर्माकडे आली आहेत. शिखर धवन पुन्हा संघात परतला आहे. विजय हजारे करंडकमध्ये तो धावांसाठी संघर्ष करताना दिसून आला. त्याला सात सामन्यांत केवळ एकच अर्धशतक ठोकता आले. मधल्या फळीत लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, कृणाल पंड्या असणार आहेत. त्याचबरोबर अष्टपैलू शिवम दुबे याला पदार्पणाची संधी असल्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने दिले आहेत. शिवमच्या समावेशाने मनीष पांडे आणि संजू सॅमसन यांना बाहेर बसावे लागू शकते. खलील अहमद, युजवेंद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर यांची आपापसातच स्पर्धा असेल. म्हणूनच अंतिम अकरा जणांचा संघ निवडताना संघव्यवस्थापनाचा चांगली कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघातील प्रत्येक जण आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचे धोरण संघाने अवलंबिले आहे. कर्णधार रोहित शर्मानेही युवकांना पाठिंबा देणार असल्याचे लढतीपूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
बांगलादेश संघासाठी ही तीन सामन्यांची मालिका आपला आत्मविश्वास उंचाविण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानने चितगावमध्ये बांगलादेशला कसोटीत नमविले. त्यातच भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी बुकीने केलेल्या संपर्काबद्दल आयसीसीला कळविण्यास कसूर केल्याबद्दल शाकीब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. संघाची सूत्रे महमुदुल्लाह रियाद याच्याकडे सोपविण्यात आली आहेत. तेव्हा अशा स्थितीत बांगलादेश संघ भारताला कसा लढा देतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
यातून होणार संघ निवड : भारत - रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, युजवेंद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पंड्या, रिषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर.
बांगलादेश - महमुदुल्लाह रियाद (कर्णधार), तैजुल इस्लाम, महंमद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुश्फिकूर रहीम, अफिफ हुसेन, मोसादेक हुसेन, अमिनूल इस्लाम बिपलोब, अराफत सनी, अब्दू हैदर, अल-अमिन हुसेन, मुस्तफिझूर रहमान, शैफुल इस्लाम.
स्थळ : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
वेळ : सायंकाळी ७ पासून
आमनेसामने
८ टी-२०
८ भारताचे विजय
० बांगलादेशचा विजय
टी-२० क्रमवारी
१ - भारत
९ - बांगलादेश