इंदूर : भारताने इंदूर कसोटीत बांगलादेशवर एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला. यासोबतच भारताने कसोटी मालिकेत १-० ने आघाडीही घेतली. या कसोटीचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय शिलेदारांनी बांगलादेशला तीन दिवसातच दोन वेळा गुंडाळलं. याच कसोटीत तिसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीचा एक चाहता सुरक्षा व्यवस्था भेदून मैदानात घुसला.
या चाहत्याने मैदानाच्या जाळीवरुन उडी मारुन मैदानात प्रवेश केला. ड्रिंक्स ब्रेक सुरू असताना हा चाहता थेट विराट कोहलीला जाऊन भेटला. याचवेळी सुरक्षा रक्षकही या चाहत्याला पकडण्यासाठी दाखल झाले. मात्र कोहलीने सुरक्षा रक्षकांना दूरच थांबवत चाहत्याला फक्त वाचवलं नाही, तर त्याला आरामात बाहेर घेऊन जाण्याची विनंतीही केली.
चाहत्यांनी मैदानात घुसून आपल्या आवडत्या खेळाडूचे पाय पकडण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अनेकदा रोहित शर्माच्या चाहत्यानेही मैदानात घुसून भेट घेतली होती. पण यावेळी विराटने सुरक्षा रक्षकांना थांबवून चाहत्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी गप्पा मारल्या आणि समजही दिली.
जागतिक कसोटी चषकातील या पहिल्याच कसोटी मालिकेत भारताने विजयी सुरुवात करुन आता ३०० अंकांसह अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारतीय संघ २२ नोव्हेंबरला दुसरी आणि अखेरची कसोटी खेळणार आहे. विशेष म्हणजे ही कसोटी डे-नाईट फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. भारतात पहिल्यांदाच खेळवली जात असलेली या नव्या फॉरमॅटमधील ही ऐतिहासिक कसोटी दुपारी १ वाजता सुरु होणार आहे.
या चाहत्याने मैदानाच्या जाळीवरुन उडी मारुन मैदानात प्रवेश केला. ड्रिंक्स ब्रेक सुरू असताना हा चाहता थेट विराट कोहलीला जाऊन भेटला. याचवेळी सुरक्षा रक्षकही या चाहत्याला पकडण्यासाठी दाखल झाले. मात्र कोहलीने सुरक्षा रक्षकांना दूरच थांबवत चाहत्याला फक्त वाचवलं नाही, तर त्याला आरामात बाहेर घेऊन जाण्याची विनंतीही केली.
चाहत्यांनी मैदानात घुसून आपल्या आवडत्या खेळाडूचे पाय पकडण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अनेकदा रोहित शर्माच्या चाहत्यानेही मैदानात घुसून भेट घेतली होती. पण यावेळी विराटने सुरक्षा रक्षकांना थांबवून चाहत्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी गप्पा मारल्या आणि समजही दिली.
जागतिक कसोटी चषकातील या पहिल्याच कसोटी मालिकेत भारताने विजयी सुरुवात करुन आता ३०० अंकांसह अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारतीय संघ २२ नोव्हेंबरला दुसरी आणि अखेरची कसोटी खेळणार आहे. विशेष म्हणजे ही कसोटी डे-नाईट फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. भारतात पहिल्यांदाच खेळवली जात असलेली या नव्या फॉरमॅटमधील ही ऐतिहासिक कसोटी दुपारी १ वाजता सुरु होणार आहे.