अहमदाबाद: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यातील १६व्या षटकानंतर मैदान सोडले. त्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माने केले. रोहितने अखेरच्या चार षटकात कर्णधार म्हणून काम पाहिले. भारताने हा सामना ८ धावांनी जिंकला आणि मालिकेत २-२ अशी बरोबरी केली.
वाचा- रोहितने दिलेल्या सल्ल्यामुळे सामन्याचा निकाल बदलला; शार्दुलने केला मोठा खुलासा
विराट कोहली अचानक मैदानातून बाहेर का गेला असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर त्याचे कारण देखील स्वत: विराट कोहलीने सांगितले. तो म्हणाला, १६व्या षटकानंतर त्याच्या पायाचे स्नायू दुखत होते आणि संभाव्य दुखापतीपासून वाचण्यासाठी मी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंग करताना एक चेंडू पकडण्यासाठी मी पळत पळत ड्राइव्ह मारला. मी चेंडू तर पकडला पण तो ठिक पद्धतीने पकडला नव्हता. त्यानंतर मी आउटफिल्ड सोडून इनर सर्कलमध्ये फिल्डिंग करण्यास आलो.
वाचा- ख्रिस गेलने भारतीय जनतेचे आभार मानले, पाहा व्हिडिओ
अहमदाबादमध्ये संध्याकाळनंतर तापमानात मोठी घसरण येते. यामुळे त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. मला कोणत्याही दुखापतीपासून वाचायचे होते. त्यामुळे मी फिल्डिंग सोडली आणि डगआउटमध्ये येऊन बसलो.
वाचा- अरे तुला कळतय का? तू स्वत:च्या संघाचा अपमान करतोयस; जाफरचा वॉनला टोला
विराट मैदानातून बाहेर आल्यानंतर रोहितने नेतृत्व केले आणि संघाला विजय मिळून दिला. विराटला खरच काही दुखापत झाली आहे का आणि तो पाचव्या टी-२० लढतीत खेळणार की नाही याबद्दल अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
वाचा- विराट मैदानाबाहेर गेल्यानंतर हिटमॅनची कमाल; रोहितच्या जाळ्यात अडकला स्टोक्स
चौथ्या टी-२० विराटला धावा करता आल्या नाहीत. तो फक्त एक धाव करून बाद झाला. त्याआधीच्या दोन लढतीत विराटने अर्धशतकी खेळी केली होती.
वाचा- रोहितने दिलेल्या सल्ल्यामुळे सामन्याचा निकाल बदलला; शार्दुलने केला मोठा खुलासा
विराट कोहली अचानक मैदानातून बाहेर का गेला असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर त्याचे कारण देखील स्वत: विराट कोहलीने सांगितले. तो म्हणाला, १६व्या षटकानंतर त्याच्या पायाचे स्नायू दुखत होते आणि संभाव्य दुखापतीपासून वाचण्यासाठी मी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंग करताना एक चेंडू पकडण्यासाठी मी पळत पळत ड्राइव्ह मारला. मी चेंडू तर पकडला पण तो ठिक पद्धतीने पकडला नव्हता. त्यानंतर मी आउटफिल्ड सोडून इनर सर्कलमध्ये फिल्डिंग करण्यास आलो.
वाचा- ख्रिस गेलने भारतीय जनतेचे आभार मानले, पाहा व्हिडिओ
अहमदाबादमध्ये संध्याकाळनंतर तापमानात मोठी घसरण येते. यामुळे त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. मला कोणत्याही दुखापतीपासून वाचायचे होते. त्यामुळे मी फिल्डिंग सोडली आणि डगआउटमध्ये येऊन बसलो.
वाचा- अरे तुला कळतय का? तू स्वत:च्या संघाचा अपमान करतोयस; जाफरचा वॉनला टोला
विराट मैदानातून बाहेर आल्यानंतर रोहितने नेतृत्व केले आणि संघाला विजय मिळून दिला. विराटला खरच काही दुखापत झाली आहे का आणि तो पाचव्या टी-२० लढतीत खेळणार की नाही याबद्दल अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
वाचा- विराट मैदानाबाहेर गेल्यानंतर हिटमॅनची कमाल; रोहितच्या जाळ्यात अडकला स्टोक्स
चौथ्या टी-२० विराटला धावा करता आल्या नाहीत. तो फक्त एक धाव करून बाद झाला. त्याआधीच्या दोन लढतीत विराटने अर्धशतकी खेळी केली होती.