नॉर्थ साउंड (अँटिग्वा): आठव्यांदा फायनलमध्ये धडक मारणाऱ्या भारताचे लक्ष्य आहे ते इंग्लंडला नमवून १९ वर्षांखालील वनडे वर्ल्ड कपचे जेतेपद (England U19 Vs India U19 Final) पटकावण्याचे. शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता व्हिवियन रिचर्ड्स मैदानावर ही अंतिम फेरी रंगणार आहे. भारताने अशी कामगिरी केली तर हे भारताचे पाचवे युवा जग्गजेतेपद ठरेल. सध्याचा फॉर्म बघता जेतेपदासाठी यश धुलच्या भारतालाच ‘फेव्हरिट’ मानले जात आहे. तसे असले तरी इंग्लंडला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.
वाचा-पाकिस्तानच्या इज्जतीचा फालुदा; IPLसाठी या दिग्गजाने PCBला दाखवला ठेंगा
भारताने स्पर्धेच्या अगदी सुरुवातीपासूनच विजेत्याप्रमाणेच आत्मविश्वासाने खेळ केला आहे. स्पर्धेच्या अगदी सुरुवातीलाच संघातील खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. त्याचाही परिणाम भारतीय संघाने आपल्या खेळावर होऊ दिला नाही. विलगीकरणात खेळाडू असल्याने भारताला हाताशी असलेल्या खेळाडूंसह खेळावे लागले. मात्र भारताने चोख कामगिरी केली. मुख्य म्हणजे भारताच्या विजयात फलंदाजी, गोलंदाजी अशा दोन्ही महत्त्वाच्या बाबी सरस ठरल्या. आता इंग्लंडविरुद्ध तशाच कामगिरीची भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा असेल. मागील पाचही लढतींत भारताला विजयासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. अंगक्रिश रघुवंशी, हरनूरसिंग, यश धुल, शेख रशीद, निशांत सिंधू, राजवर्धन हंगर्गेकर, दिनेश बाणा, राज बावा, कौशल तांबे अशी खोलवर फलंदाजी भारताकडे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत कर्णधार यश धुलने शतक ठोकले होते, तर उपकर्णधार रशीदने ९४ धावांची खेळी केली होती. गोलंदाजीतही राजवर्धन हंगर्गेकर, रविकुमार, विकी ओस्तवाल, निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, अंगक्रिश असे फॉर्मात असलेले सात पर्याय भारताकडे आहेत.
वाचा- क्रिकेट न्यूजरोहित शर्मा समोर सर्वात मोठे आव्हान काय; हिटमॅनची कमकूवत बाजू समोर आली
विराटने साधला संवाद
माजी कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघातील खेळाडूंशी ऑनलाइन संवाद साधला असून, त्यांना काही टिप्सही दिल्या आहेत. इंग्लंड संघही अपराजित आहे. १९९८मध्ये इंग्लंडने जेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतर इंग्लंडला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. आता हा २४ वर्षांचा दुष्काळ संपविण्यासाठी इंग्लंड संघ उत्सुक आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना चुरशीची फायनल बघायला मिळण्याची शक्यता अधिक आहे.
वाचा- वर्ल्डकप फायनल कशी जिंकाल; टीम इंडियाच्या मदतीला आला...
आमनेसामने
७ वनडे
५ भारताचे विजय
२ इंग्लंडचे विजय
अव्वल तीन फलंदाज
भारत : अंगक्रिश रघुवंशी - २७८ धावा; राज बावा - २१७ धावा; यश धुल - २१२.
इंग्लंड : टॉम प्रेस्ट - २९२ धावा; जेकब बेथेल - २०३; जॉर्ज थॉमस - १७७.
अव्वल तीन गोलंदाज
विकी ओस्तवाल - १२ विकेट; निशांत सिंधू - ६ विकेट; रविकुमार - ६ विकेट
जोशुआ बॉयडेन - १३ विकेट; रेहान अहमद - १२ विकेट; बेथेल - ५ विकेट
वाचा- क्रिकेटमध्ये असे कधीच झाले नाही; एकाच सामन्यात शतक आणि घेतल्या इतक्या विकेट
अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास
भारत : दक्षिण आफ्रिकेवर ४५ धावांनी मात; आयर्लंडवर १७४ धावांनी मात; युगांडावर ३२६ धावांनी मात; बांगलादेशवर पाच विकेटनी मात; ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी मात.
इंग्लंड : बांगलादेशवर सात विकेटनी मात; कॅनडावर १०६ धावांनी मात; यूएईवर १८९ धावांनी मात; दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेटनी मात; अफगाणिस्तानवर १५ धावांनी मात.
वाचा-गोलंदाज म्हणाला, थोडी दया दाखव; भारताच्या फलंदाजाने ५००च्या स्ट्राइक रेट धावा...
खेळ आकड्यांचा
५/४०५ : यंदाच्या वर्ल्ड कपमधील भारताची सर्वोच्च धावसंख्या. युगांडाविरुद्ध भारताने ही धावसंख्या उभारली होती. ही यंदाच्या वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
६/३६२ : यंदाच्या वर्ल्ड कपमधील इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्या. यूएईविरुद्ध इंग्लंडने धावांचा असा डोंगर उभारला होता. ही यंदाच्या वर्ल्ड कपमधील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
यातून होणार संघ निवड :
भारत - यश धुल (कर्णधार), हरनूरसिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगर्गेकर, विकी ओस्तवाल, गर्व संगवान, दिनेश बाणा, आराध्य यादव, राज बावा, वसू वत्स, रवीकुमार.
इंग्लंड - टॉम प्रेस्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जोशुआ बॉयडेन, अॅलेक्स हॉर्टन, रेहान अहमद, जेम्स सेल्स, जॉर्ज थॉमस, थॉमस अस्पिनवॉल, नॅथन बर्नवॉल, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, विल्यम लक्झटन, जेम्स रेव, फातेह सिंग, बेंजामिन क्लिफ.
सामन्याची वेळ : सायंकाळी ६.३० पासून
वाचा-पाकिस्तानच्या इज्जतीचा फालुदा; IPLसाठी या दिग्गजाने PCBला दाखवला ठेंगा
भारताने स्पर्धेच्या अगदी सुरुवातीपासूनच विजेत्याप्रमाणेच आत्मविश्वासाने खेळ केला आहे. स्पर्धेच्या अगदी सुरुवातीलाच संघातील खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. त्याचाही परिणाम भारतीय संघाने आपल्या खेळावर होऊ दिला नाही. विलगीकरणात खेळाडू असल्याने भारताला हाताशी असलेल्या खेळाडूंसह खेळावे लागले. मात्र भारताने चोख कामगिरी केली. मुख्य म्हणजे भारताच्या विजयात फलंदाजी, गोलंदाजी अशा दोन्ही महत्त्वाच्या बाबी सरस ठरल्या. आता इंग्लंडविरुद्ध तशाच कामगिरीची भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा असेल. मागील पाचही लढतींत भारताला विजयासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. अंगक्रिश रघुवंशी, हरनूरसिंग, यश धुल, शेख रशीद, निशांत सिंधू, राजवर्धन हंगर्गेकर, दिनेश बाणा, राज बावा, कौशल तांबे अशी खोलवर फलंदाजी भारताकडे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत कर्णधार यश धुलने शतक ठोकले होते, तर उपकर्णधार रशीदने ९४ धावांची खेळी केली होती. गोलंदाजीतही राजवर्धन हंगर्गेकर, रविकुमार, विकी ओस्तवाल, निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, अंगक्रिश असे फॉर्मात असलेले सात पर्याय भारताकडे आहेत.
वाचा- क्रिकेट न्यूजरोहित शर्मा समोर सर्वात मोठे आव्हान काय; हिटमॅनची कमकूवत बाजू समोर आली
विराटने साधला संवाद
माजी कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघातील खेळाडूंशी ऑनलाइन संवाद साधला असून, त्यांना काही टिप्सही दिल्या आहेत. इंग्लंड संघही अपराजित आहे. १९९८मध्ये इंग्लंडने जेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतर इंग्लंडला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. आता हा २४ वर्षांचा दुष्काळ संपविण्यासाठी इंग्लंड संघ उत्सुक आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना चुरशीची फायनल बघायला मिळण्याची शक्यता अधिक आहे.
वाचा- वर्ल्डकप फायनल कशी जिंकाल; टीम इंडियाच्या मदतीला आला...
आमनेसामने
७ वनडे
५ भारताचे विजय
२ इंग्लंडचे विजय
अव्वल तीन फलंदाज
भारत : अंगक्रिश रघुवंशी - २७८ धावा; राज बावा - २१७ धावा; यश धुल - २१२.
इंग्लंड : टॉम प्रेस्ट - २९२ धावा; जेकब बेथेल - २०३; जॉर्ज थॉमस - १७७.
अव्वल तीन गोलंदाज
विकी ओस्तवाल - १२ विकेट; निशांत सिंधू - ६ विकेट; रविकुमार - ६ विकेट
जोशुआ बॉयडेन - १३ विकेट; रेहान अहमद - १२ विकेट; बेथेल - ५ विकेट
वाचा- क्रिकेटमध्ये असे कधीच झाले नाही; एकाच सामन्यात शतक आणि घेतल्या इतक्या विकेट
अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास
भारत : दक्षिण आफ्रिकेवर ४५ धावांनी मात; आयर्लंडवर १७४ धावांनी मात; युगांडावर ३२६ धावांनी मात; बांगलादेशवर पाच विकेटनी मात; ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी मात.
इंग्लंड : बांगलादेशवर सात विकेटनी मात; कॅनडावर १०६ धावांनी मात; यूएईवर १८९ धावांनी मात; दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेटनी मात; अफगाणिस्तानवर १५ धावांनी मात.
वाचा-गोलंदाज म्हणाला, थोडी दया दाखव; भारताच्या फलंदाजाने ५००च्या स्ट्राइक रेट धावा...
खेळ आकड्यांचा
५/४०५ : यंदाच्या वर्ल्ड कपमधील भारताची सर्वोच्च धावसंख्या. युगांडाविरुद्ध भारताने ही धावसंख्या उभारली होती. ही यंदाच्या वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
६/३६२ : यंदाच्या वर्ल्ड कपमधील इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्या. यूएईविरुद्ध इंग्लंडने धावांचा असा डोंगर उभारला होता. ही यंदाच्या वर्ल्ड कपमधील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
यातून होणार संघ निवड :
भारत - यश धुल (कर्णधार), हरनूरसिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगर्गेकर, विकी ओस्तवाल, गर्व संगवान, दिनेश बाणा, आराध्य यादव, राज बावा, वसू वत्स, रवीकुमार.
इंग्लंड - टॉम प्रेस्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जोशुआ बॉयडेन, अॅलेक्स हॉर्टन, रेहान अहमद, जेम्स सेल्स, जॉर्ज थॉमस, थॉमस अस्पिनवॉल, नॅथन बर्नवॉल, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, विल्यम लक्झटन, जेम्स रेव, फातेह सिंग, बेंजामिन क्लिफ.
सामन्याची वेळ : सायंकाळी ६.३० पासून