अ‍ॅपशहर

Virat Kohli News:विराटचा काऊंटडाऊन सुरू; फक्त १० दिवस शिल्लक, संघातून मिळू शकतो डच्चू

Virat Kohli T20 World Cup: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे की इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली नाही तर...

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jul 2022, 12:37 pm
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ९ महिन्यांनी विराट कोहली अशा स्थितीत आहे जेथे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डपक (T20 World Cup 2022)मध्ये भारतीय संघात स्थान मिळवणे अवघड झाले आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने बुधवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे संघाची निवड केली. या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे तर उपकर्णधारपद रविंद्र जडेजाकडे सोपवले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Virat Kohli ODI
विराट कोहली


वनडे मालिकेसाठी नियमीत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रोहित, पंत आणि पंड्या हे पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळणार आहेत. दुसऱ्या बाजूला विराटचे भवितव्य या गोष्टीवर ठरणार आहे की तो पुढील १० दिवसात इंग्लंडविरुद्ध टी-२० आणि वनडे मालिकेत कशी कामगिरी करतो.

वाचा- MS Dhoni Birthday: फक्त धोनीच करू शकतो; 'हे' ५ विक्रम मोडणे अवघड नाही तर अशक्यच!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने विराटला टी-२० संघाच्या मधळ्या फळीत फिट करण्याबाबत अद्याप स्पष्ट काही सांगितले नाही. वरिष्ठ खेळाडूंच्या आढावा घेतल्यानंतर टी-२० संघाचा विचार केला जाईल. रोहित, पंत आणि पंड्या हे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळण्याची शक्यता आहे. बुमराहला टी-२० मध्ये संधी दिली जाणार नाही. आता राहता राहिला विराट कोहलीचा प्रश्न तर टी-२० वर्ल्डकपसाठी निवडसमिती काय निर्णय घेते हे पाहावे लागले. इंग्लंडविरुद्धची आगामी मालिका विराटसाठी फार महत्त्वाची असेल.

गेल्या एक वर्षाहून अधिक काळ झाला विराटने कसोटी, वनडे आणि टी-२० मध्ये अपेक्षित कामगिरी केली नाही. टी-२० क्रिकेटमधील त्याचा संघर्ष आयपीएलमध्ये देखील दिसून आला होता. दुसऱ्या बाजूला भारताकडे सूर्यकुमार यादव, पंत, पंड्या, जडेजा आणि दीपक हुड्डा, संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर असे अनेक पर्याय आहेत. हे सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. अशाच विराट कोहली मागे पडू शकतो. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन मर्यादीत षटकासाठी सर्वोत्तम संघ निवडण्याचा विचार करत आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या मालिकेत संघ जवळ जवळ पक्का होईल.

वाचा- सासरी सापडला कुस्तीपटूचा मृतदेह; मृत्यूच्याआधी फेसबुक लाइव्हमध्ये केला गंभीर आरोप

बीसीसीआय नाराज

टाइम्स ऑफ इंडियाला मिळालेल्या माहितीनुसार, संघातील वरिष्ठ खेळाडूंचे वारंवार संघाबाहेर बसण्याने भारतीय क्रिकेट बोर्ड नाराज आहे. निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत वर्क लोड मॅनेजमेंटचा मुद्दा येतो. रोहित, कोहली, पंड्या आणि बुमराह, शमी यांना विश्रांतीची गरज आहे. या सर्व खेळाडूंना नेहमी आराम दिला जातो. कोच आणि फिजिओकडून देखील निवड समितीला नोटिस दिली जाते की या खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे.

पंत वगळता सर्वांना मिळतो

वरील सर्व खेळाडू प्रत्येक दुसऱ्या मालिकेत संघाबाहेर असतात. या सर्वांकडे बीसीसीआयचे चांगले करार आहेत. पूर्णवेळ कर्णधारपद संभाळल्यानंतर रोहित फार कमी सामन्यात खेळला आहे. पंड्या पुन्हा संघात दाखल झालाय. बुमराह आणि शमी देखील निवडक सामन्यात खेळले आहेत. विराटला देखील प्रत्येक मालिकेनंतर विश्रांती दिली आहे. यामुळे एक चांगला संघ होण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. पंत हा एकमेव खेळाडू आहे जो गेल्या काही वर्षात भारताकडून सर्वाधिक खेळलाय.

वाचा- क्रिकेटपटूवर झाला अन्याय; पत्नीने बोर्डाविरुद्ध शड्डू ठोकला

विश्रांतीचा ग्राफ

नोव्हेंबर महिन्यात भारताचा कर्णधार झाल्यानंतर रोहितने दोन कसोटी, ९ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळले आहेत. तर कोहलीने ६ कसोटी, ६ वनडे आणि २ टी-२० सामने खेळले आहेत.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज