अ‍ॅपशहर

भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा कसोटी सामना पाहायला मिळणार, जाणून घ्या कुठे होणार हे सामने

India vs Pakistan - भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००७ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता. त्यानंतर अनेक एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळवले गेले आहेत, परंतु चाहत्यांना दोन्ही देशांमधील कसोटी सामना ही आता खेळवला जाणार आहे.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2022, 5:25 pm
मेलबर्न: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमधील सामने क्रिकेटप्रेमींसाठी मोठी अटीतटीची लढत पाहण्याची एक संधी असते. चाहते हे सामने पहाण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. भारत-पाकिस्तान समान्यांसाठीची तिकिटे चाहते बराच काळ आधी काढून ठेवतात, जेणेकरून प्रत्यक्षात या सामान्यांचा आनंद लुटता येईल. या संघांमध्ये आतापर्यंत टी-२० आणि एकदिवसीय सामने आपण आहेत आलो आहोत. पण आता या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने देखील पाहायला मिळणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ind vs pak test match at mcg


यंदाच्या टी-२० विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात झालेल्या सामन्याचे यश पाहून मेलबर्न क्रिकेट क्लबला (MCC) या दोन देशांमधील कसोटी सामन्याचे आयोजन करायचे आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) चे व्यवस्थापन करणाऱ्या MCC आणि व्हिक्टोरियन सरकारने अलीकडेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) सोबत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामना आयोजित करण्याबाबत चर्चा केली.

वाचा: पराभव दक्षिण आफ्रिकेचा फायदा भारताचा! टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायनलच्या दिशेने मोठे पाऊल

वर्ल्ड कपमध्ये ९० हजार प्रेक्षक

एमसीसीचे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक सामन्यातील शानदार यशानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या दोन देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात ९० हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. फॉक्स यांनी सेन रेडिओला सांगितले की, 'साहजिकच एमसीजीमध्ये सलग तीन कसोटी सामन्यांचे शानदार आयोजन होऊ शकते. स्टेडियम प्रत्येक वेळी खचाखच भरलेले असेल. याबाबत आम्ही माहिती घेतली आहे.'

हेही वाचा: संघातून बाहेर केल्यानंतरचे दु:ख सोशल मीडियावर व्यक्त केलं; काही मिनिटात भारतीय खेळाडूनं

पुढे ते म्हणाले, ''आम्ही याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोललो आहोत. मला माहित आहे (व्हिक्टोरिया) सरकारनेही असे केले आहे. व्यस्त वेळापत्रकात हे खूप क्लिष्ट होईल त्यामुळे मला विश्वास आहे की हे कदाचित एक मोठे आव्हान आहे. फॉक्स म्हणाले की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबद्दल आयसीसीशी बोलले पाहिजे. मला अशा आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलिया याविषयी आयसीसीशी संवाद साधत राहील आणि त्यावर जोर देत राहील. जेव्हा तुम्ही जगभरात अनेक स्टेडियम रिकामे पाहता तेव्हा मला वाटते की खचाखच भरलेले स्टेडियम आणि तेथील वातावरण खेळासाठी चांगले असेल.

वाचा: सूर्यकुमार यादवसाठी २०२२ ठरलं लकी, ICC च्या मोठ्या अवॉर्डसाठी नामांकन

२००७ मध्ये अखेरचा कसोटी सामना

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिका शेवटची २००७ मध्ये खेळली गेली होती. यानंतर त्यांचा सामना फक्त आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषद स्पर्धेत झाला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पुढील चक्रात पाकिस्तान २०२३ मध्ये MCG येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक सामन्याप्रमाणे स्टेडियम खचाखच भरले जाईल, अशी आशा फॉक्स यांना आहे.

हेही वाचा: वयाच्या ४९ व्या वर्षी सचिन तेंडुलकर घेतोय नव्या खेळाचे धडे, पण त्या खेळातही आठवतोय

तर ते पुढे म्हणाले, 'भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात जे वातावरण तयार झाले होते, असे वातावरण एमसीजीमध्ये याआधी मी कधी पाहिले नव्हते. प्रत्येक चेंडूनंतरचा तो आवाज अभूतपूर्व होता. लोकांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मुलांसह याचा पूर्णपणे आनंद घेतला.'
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज