विशाखापट्टणम:
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीचा पहिलाच दिवस रोहित शर्माचा होता. त्याने धमाकेदार शतक झळकावलं होतं. या सामन्याचा दुसरा दिवस मात्र मयांक अग्रवालचा ठरला. मयांकने झंझावाती द्विशतक करत क्रीडाप्रेमींना खूश केलं. ३७१ चेंडूंमध्ये २३ चौकार आणि ६ षटकार लगावत मयांकने २१५ धावा कुटल्या. दरम्यान, भारताने पहिला डाव ७ बाद ५०२ धावांवर घोषित केला.
मयांक भारतात आपली पहिलीच कसोटी खेळत आहे. सलामीला आलेल्या मयांकने दुसऱ्या दिवशीच्या खेळात पहिल्या सत्रात शतक पूर्ण केलं, तर दुसऱ्या सत्रात द्विशतक पूर्ण केलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा मयांक अग्रवाल शतकापासून अवघ्या १६ धावा दूर होता. त्यामुळे त्याने शतक सहज पूर्ण केलं. ६९ व्या षटकात २०४ चेंडूत मयांकचं शतक पूर्ण झालं. ३५८ व्या चेंडूवर त्याने आपल्या २०० धावा पूर्ण केल्या. हे त्याच्या टेस्ट करिअरचंदेखील पहिलं आणि दुहेरी शतक आहे. यापूर्वी त्याचा टेस्टचा बेस्ट स्कोअर ७७ धावा होता, जो त्याने ऑस्ट्रेिलया विरुद्ध सिडनी बनवला होता.
मयांकनं २०१८-१९ मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेपासून कसोटी पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग अर्धशतकं ठोकून त्यानं आपलं स्थान पक्कं केलं. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतही मयांकनं ५० हून अधिक धावा करत लक्ष वेधून घेतले.
३१७ धावांची भागीदारी
विशाखापट्टणम येथे कालपासून सुरू झालेल्या सामन्यात भारताच्या या सलामीच्या जोडीनं तळ ठोकला होता. दोघांनी ८२ षटकांत ३१७ धावा केल्या. रोहित शर्मानं काल कसोटी कारकिर्दीतलं चौथं शतक ठोकल्यानंतर आज मयांक अग्रवालनं त्यावर कळस चढवला. या दोघांनी भागीदारी करत एकूण ३१७ धावा केल्या. यासोबतच या भागीदारीमुळे काही विक्रमही झाले.
पहिल्या दिवसाचा खेळ असा होता
बुधवारी भारताने ५९.१ षटकात बिनबाद २०२ धावा करत चांगली सुरुवात केली. चहापानादरम्यान जोराचा पाऊस सुरू झाला, त्यामुळे ३ वाजून ३० मिनिटांनी कालचा पुढील खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. तेव्हा रोहित नाबाद ११५ आणि मयांक अग्रवाल नाबाद ८४ वर खेळत होते.
भारतासाठी तिसरी सर्वश्रेष्ठ सलामी भागीदारी
रोहित आणि मयांक यांनी भारतासाठी तिसरी सर्वश्रेष्ठ भागीदारी केली आहे. विनू मंकड आणि पंकज रॉय यांच्या नावे भारताच्या सर्वश्रेष्ठ सलामी भागीदारीचा विक्रम नोंदलेला आहे. त्यांनी १९५६ मध्ये न्यूझिलंडविरुद्ध ४१३ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर २००६ मध्ये वीरेंद्र सहवाग आणि राहुल द्रविड यांनी केलेली ४१० धावांची भागीदारी दुसऱ्या स्थानी आहे.
टीम इंडियाच्या तोफा धडाडल्या; रोहितनंतर मयांकचंही शतक
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीचा पहिलाच दिवस रोहित शर्माचा होता. त्याने धमाकेदार शतक झळकावलं होतं. या सामन्याचा दुसरा दिवस मात्र मयांक अग्रवालचा ठरला. मयांकने झंझावाती द्विशतक करत क्रीडाप्रेमींना खूश केलं. ३७१ चेंडूंमध्ये २३ चौकार आणि ६ षटकार लगावत मयांकने २१५ धावा कुटल्या. दरम्यान, भारताने पहिला डाव ७ बाद ५०२ धावांवर घोषित केला.
मयांक भारतात आपली पहिलीच कसोटी खेळत आहे. सलामीला आलेल्या मयांकने दुसऱ्या दिवशीच्या खेळात पहिल्या सत्रात शतक पूर्ण केलं, तर दुसऱ्या सत्रात द्विशतक पूर्ण केलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा मयांक अग्रवाल शतकापासून अवघ्या १६ धावा दूर होता. त्यामुळे त्याने शतक सहज पूर्ण केलं. ६९ व्या षटकात २०४ चेंडूत मयांकचं शतक पूर्ण झालं. ३५८ व्या चेंडूवर त्याने आपल्या २०० धावा पूर्ण केल्या. हे त्याच्या टेस्ट करिअरचंदेखील पहिलं आणि दुहेरी शतक आहे. यापूर्वी त्याचा टेस्टचा बेस्ट स्कोअर ७७ धावा होता, जो त्याने ऑस्ट्रेिलया विरुद्ध सिडनी बनवला होता.
मयांकनं २०१८-१९ मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेपासून कसोटी पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग अर्धशतकं ठोकून त्यानं आपलं स्थान पक्कं केलं. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतही मयांकनं ५० हून अधिक धावा करत लक्ष वेधून घेतले.
३१७ धावांची भागीदारी
विशाखापट्टणम येथे कालपासून सुरू झालेल्या सामन्यात भारताच्या या सलामीच्या जोडीनं तळ ठोकला होता. दोघांनी ८२ षटकांत ३१७ धावा केल्या. रोहित शर्मानं काल कसोटी कारकिर्दीतलं चौथं शतक ठोकल्यानंतर आज मयांक अग्रवालनं त्यावर कळस चढवला. या दोघांनी भागीदारी करत एकूण ३१७ धावा केल्या. यासोबतच या भागीदारीमुळे काही विक्रमही झाले.
पहिल्या दिवसाचा खेळ असा होता
बुधवारी भारताने ५९.१ षटकात बिनबाद २०२ धावा करत चांगली सुरुवात केली. चहापानादरम्यान जोराचा पाऊस सुरू झाला, त्यामुळे ३ वाजून ३० मिनिटांनी कालचा पुढील खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. तेव्हा रोहित नाबाद ११५ आणि मयांक अग्रवाल नाबाद ८४ वर खेळत होते.
भारतासाठी तिसरी सर्वश्रेष्ठ सलामी भागीदारी
रोहित आणि मयांक यांनी भारतासाठी तिसरी सर्वश्रेष्ठ भागीदारी केली आहे. विनू मंकड आणि पंकज रॉय यांच्या नावे भारताच्या सर्वश्रेष्ठ सलामी भागीदारीचा विक्रम नोंदलेला आहे. त्यांनी १९५६ मध्ये न्यूझिलंडविरुद्ध ४१३ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर २००६ मध्ये वीरेंद्र सहवाग आणि राहुल द्रविड यांनी केलेली ४१० धावांची भागीदारी दुसऱ्या स्थानी आहे.
टीम इंडियाच्या तोफा धडाडल्या; रोहितनंतर मयांकचंही शतक