अ‍ॅपशहर

भारताच्या विजयाच्या अपेक्षांवर पाणी? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट

Ind vs Sa 2nd T20-भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे होणार आहे. या सामन्यात पाऊस मोठा अडथळा ठरू शकतो, त्यामुळे भारताच्या विजयाच्या आकांक्षाना धक्का बेसल.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Oct 2022, 11:42 am
गुवाहाटी: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ट्वेंटी -२० मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. हा दुसरा सामना आज (२ सप्टेंबर) रोजी खेळला जाणार आहे. अहिल्या सामन्यातील एकहाती विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच बळावला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी आरतीय संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघामध्ये आजच्या सामन्यासाठी काही बदल तर नक्कीच होतील पण विजयश्री मिळवण्याच्या हेतूने संघ आपली कामगिरी बजावेल. पण संघाच्या या मेहनतीवर पाऊस मात देण्याची शक्यता दिसत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ind vs sa pitch


रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसऱ्या टी-२० च्या आधी आकाशात आच्छादलेल्या ढगांमुळे आयोजक आणि चाहते चिंतेत पडले आहेत, कारण पावसामुळे या स्टेडियममधील मागील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना रद्द करण्यात आले होते. करोना महामारीनंतर गुवाहाटीमधला हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे, ज्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

मास्टर ब्लास्टरने पुन्हा भारताला जिंकवलं! नमन ओझाच्या तुफानी खेळीने India Legends विजयी

बारसापारा स्टेडियमवरील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ५ जानेवारी २०२० रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-२० सामना होणार होता, जो संततधार पावसामुळे रद्द करावा लागला होता. सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, प्रेक्षकांना पुन्हा स्टेडियममध्ये पाहणे आश्चर्यकारक आहे. द्रविड म्हणाले, 'जूनपासून सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत, जेव्हा जेव्हा आम्ही भारतात खेळतो तेव्हा सर्व स्टेडियम खचाखच भरलेले असतात. हे पाहणे अद्भूत आहे.'

मास्टर ब्लास्टरने पुन्हा भारताला जिंकवलं! नमन ओझाच्या तुफानी खेळीने India Legends विजयी

प्रादेशिक हवामान विभागाने रविवारी गुवाहाटीमध्ये एक किंवा दोन वेळा पाऊस आणि गडगडाटासह अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आयोजकांनी मात्र पावसामुळे वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी सर्व व्यवस्था केल्याचे सांगितले. आसाम क्रिकेट असोसिएशनने अमेरिकेकडून दोन 'अति हलके' पिच कव्हर्स खरेदी केली आहेत. केंद्रीय सचिव देवजित सैकिया म्हणाले होते, "हे दोन्ही आयात केलेले कव्हर खेळपट्टीत पाणी किंवा आर्द्रता येणार नाही याची खात्री करतील."

जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर प्रथमच घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका जिंकेल. या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर संघाचे हे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख