अ‍ॅपशहर

Rishabh Pant News: आजवर एकाही विकेटकीपरला जमले नाही; पंतने इतिहास घडवला, मिळाला हा पुरस्कार

India vs Sri Lanka Test Series: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली. पंतच्या या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2022, 12:43 pm
बेंगळुरू: भारत आणि श्रीलंका यांच्यात बेंगळुरू येथील कसोटी तिसऱ्याच दिवशी संपली. भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या डावात ऑलआउट करत सामना २३८ धावांनी जिंकला आणि मालिका २-०ने जिंकली. या मालिकेत विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतला मालिकावीर तर श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ऋषभ पंत
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका- ऋषभ पंत मालिकावीर


वाचा- IPLच्या नियमात मोठा बदल; प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करता येणार, DRSची संख्या वाढवली

ऋषभ पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा भारताचा पहिला विकेटकीपर ठरला आहे. त्याच्याआधी महेंद्र सिंह धोनी, ऋद्धिमान साहा, किरण मोरे, सैयद किरमानीसह अनेक दिग्गज खेळाडूंनी भारतासाठी विकेटकीपर म्हणून भूमिकापार पाडली होती. पण आजवर कोणत्याही विकेटकीपरला कसोटीत हा पुरस्कार मिळाला नव्हता.

वाचा- गुजरात टायटन्सला बसू शकतो मोठा झटका, हार्दिक पंड्याच्या खेळण्याबाबत...

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पंतने ३ डावात फलंदाजी केली. यात त्याने १८५ धावा केल्या. त्याची सरासरी ६१.६७ तर स्ट्राइक रेट १२०.१३चा होता. पंतने २ कसोटीत २३ चौकार आणि ६ षटकार मारले. मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पंतचे शतक हुकले होते. तो ९६ धावांवर बाद झाला. दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात त्याने २८ चेंडूत अर्धशतक केले. भारताकडून सर्वात वेगाने अर्धशतक करण्याचा विक्रम पंतने केला.

वाचा- भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या; सामना सुरू असताना २० राउंड फायरिंग केले

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दोन्ही सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने श्रीलंकेला २०८ धावांवर बाद केले आणि सामना जिंकला. ही मालिका रोहित शर्माची कसोटी कर्णधार म्हणून पहिलीच मालिका होती आणि या पहिल्याच मालिकेत त्याने विजय मिळवला. रोहित शर्माने टीम इंडियाचा नियमीत कर्णधार म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने आधी वेस्ट इंडिजचा टी-२० आणि वनडे पराभव केला. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धची टी-२० आणि कसोटी मालिका जिंकली.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख