अ‍ॅपशहर

India vs West Indies Live: वेस्ट इंडिजचा भारतावर आठ गडी राखून विजय

टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिज संघावर ६ गडी राखून मात केल्यानंतर आज होत असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तिरुवनंतपूरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होत आहे. विराट कोहलीने टी-२० सामन्यात होमपीचवर ९७५ धावा केल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात एक हजार धावा पूर्ण करून त्याला नवा विक्रम रचता येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2019, 10:26 pm
तिरुवनंतपूरम: टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिज संघावर ६ गडी राखून मात केल्यानंतर आज होत असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तिरुवनंतपूरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होत आहे. विराट कोहलीने टी-२० सामन्यात होमपीचवर ९७५ धावा केल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात एक हजार धावा पूर्ण करून त्याला नवा विक्रम रचता येणार आहे. त्यामुळे त्याच्या या विक्रमाकडेही क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat


भारत-वेस्ट इंडिज लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

जाणून घ्या या टी-२० सामन्यातील लाइव्ह अपडेट्स...

>> वेस्ट इंडिजचा भारतावर आठ गडी राखून विजय

>> विंडीजचा संघ विजयासमीप...विजयासाठी हव्यात ११ धावा

>> १५ षटकानंतर वेस्ट इंडिज २ बाद १४२ धावा

>> १० षटकानंतर वेस्ट इंडिज एक बाद ७३ धावा

>> वेस्ट इंडिजला पहिला धक्का; लेविस ४० धावांवर बाद

>> वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांची धमाकेदार सुरूवात

>> भारताचे विंडीजला विजयासाठी १७१ धावांचे आव्हान

>> १९ षटकानंतर भारताच्या ६ बाद १६४ धावा

>> भारताला पाचवा धक्का, श्रेयश अय्यर झेलबाद; भारत ५ बाद १४४ धावा

>> भारत १५ षटकानंतर ४ बाद १३२ धावा

>> भारत १४ षटकानंतर ४ बाद १२८ धावा; रिषभ पंत व श्रेयश अय्यर मैदानात

>> भारताला चौथा धक्का; कर्णधार विराट कोहली १९ धावांवर तंबूत परतला

>> भारत १३ षटकानंतर ३ बाद ११९ धावा

>> भारत ११ षटकानंतर ३ बाद १०४ धावा

>> शिवम दुबे झेलबाद; ३० चेंडूत ५४ धावांची झंझावती खेळी

>> भारताचा डावखुरा फलंदाज शिवम दुबेचे शानदार अर्धशतक

>> भारताला दुसरा धक्का; रोहित शर्मा १५ धावांवर बाद; ७.४ षटकानंतर भारत दोन बाद ५६ धावा

>> चार षटकांनंतर भारत एक बाद २८ धावा

> भारताला पहिला धक्का; सलामीवीर केएल राहुल ११ धावांवर बाद

> भारत- वेस्टइंडिज दुसरी टी-२०: वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज