कटक: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरी आणि अखेरची वनडे कटक येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने तर दुसरा टीम इंडियाने जिंकल्यामुळे अखरेचा सामना निर्णायक होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा अनेक विक्रम त्यांच्या डोळ्यासमोर असतील. यात सर्वात मोठा विक्रम करण्याची संधी हिटमॅन रोहित शर्माला असणार आहे. रोहितची एक मोठी खेळी त्याच्या नावावर अनेक विक्रम करणारी ठरू शकते. जाणून घेऊयात या सामन्यात होणारे विक्रमांवर....
>> या वर्षभरात एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर १ हजार ४२७ धावा झाल्या आहेत. यात ७ शतकांचा समावेश आहे. तर कर्णधार विराट कोहलीच्या नावावर १ हजार ४६० धावांची नोंद आहे. विराटने २०१७मध्ये १ हजार ४६० धावा केल्या होत्या. जर या सामन्यात रोहितने ३४ धावा केल्या तर तो एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे.
>> याशिवाय रोहितने ९ धावा काढल्या तर तो श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा २२ वर्ष जुना विक्रम मोडू शकतो. रोहितला सलामीवीर म्हणून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून २०१९मध्ये रोहितने २ हजार ३७९ धावा केल्या आहेत. तर जयसूर्याने १९९७मध्ये २ हजार ३८७ धावा केल्या होत्या.
>> विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्या हॅट्टिक घेणाऱ्या कुलदीप यादव याला वनडे क्रिकेटमध्ये १०० विकेट घेण्यासाठी केवळ एका विकेटची गरज आहे. या सामन्यात १ विकेट घेतल्यास तो विकेट घेण्याचे शतक पूर्ण करेल.
>> चहल-कुलदीप या जोडीने भारताला २४ सामन्यात विजय मिळवून दिला आहे. आता या सामन्यात विराट हॅट्टिक घेणाऱ्या कुलदीपला संधी देतो की पुन्हा या दोघांना संघात स्थान देतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
>> कटकच्या बाराबती मैदानावर भारताने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध या मैदानावर आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि त्या तिन्हीमध्ये विजय मिळवला आहे. याशिवाय येथे टीम इंडियाने खेळलेल्या १६ पैकी १२ सामन्यात विजय मिळवला आहे. तर केवळ चारमध्ये पराभव झाला आहे.
>> पहिल्या सामन्यातील धक्कादायक पराभवानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात शानदार कमबॅक केले होते. तिसऱ्या वनडेत विजय मिळवून विराट आणि कंपनी विंडीजविरुद्ध सलग १०वी द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
>> या वर्षभरात एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर १ हजार ४२७ धावा झाल्या आहेत. यात ७ शतकांचा समावेश आहे. तर कर्णधार विराट कोहलीच्या नावावर १ हजार ४६० धावांची नोंद आहे. विराटने २०१७मध्ये १ हजार ४६० धावा केल्या होत्या. जर या सामन्यात रोहितने ३४ धावा केल्या तर तो एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे.
>> याशिवाय रोहितने ९ धावा काढल्या तर तो श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा २२ वर्ष जुना विक्रम मोडू शकतो. रोहितला सलामीवीर म्हणून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून २०१९मध्ये रोहितने २ हजार ३७९ धावा केल्या आहेत. तर जयसूर्याने १९९७मध्ये २ हजार ३८७ धावा केल्या होत्या.
>> विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्या हॅट्टिक घेणाऱ्या कुलदीप यादव याला वनडे क्रिकेटमध्ये १०० विकेट घेण्यासाठी केवळ एका विकेटची गरज आहे. या सामन्यात १ विकेट घेतल्यास तो विकेट घेण्याचे शतक पूर्ण करेल.
>> चहल-कुलदीप या जोडीने भारताला २४ सामन्यात विजय मिळवून दिला आहे. आता या सामन्यात विराट हॅट्टिक घेणाऱ्या कुलदीपला संधी देतो की पुन्हा या दोघांना संघात स्थान देतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
>> कटकच्या बाराबती मैदानावर भारताने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध या मैदानावर आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि त्या तिन्हीमध्ये विजय मिळवला आहे. याशिवाय येथे टीम इंडियाने खेळलेल्या १६ पैकी १२ सामन्यात विजय मिळवला आहे. तर केवळ चारमध्ये पराभव झाला आहे.
>> पहिल्या सामन्यातील धक्कादायक पराभवानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात शानदार कमबॅक केले होते. तिसऱ्या वनडेत विजय मिळवून विराट आणि कंपनी विंडीजविरुद्ध सलग १०वी द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.