अ‍ॅपशहर

आजच्या दिवशी भारताने जिंकला होता आशिया चषक

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील अंतिम फेरीचा सामना रंगला होता. दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी आशिया चषक पटकावण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया चषक उंचावला होता. पण या सामन्यात नक्कीच झाले होते तरी काय, जाणून घेऊया...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2020, 3:21 pm
आजचा दिवस म्हणजे १३ एप्रिल हा भारतीय चाहत्यांसाठी अविस्मरणीय असाच असेल. कारण आजच्याच दिवशी भारताने पहिल्यांदा आशिया चषक जिंकला होता. भारताने पाकिस्तानला नमवत ही देदिप्यमान कामगिरी केली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind won


ही गोष्ट आहे १३ एप्रिल १९८४ची. आजच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील अंतिम फेरीचा सामना रंगला होता. दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी आशिया चषक पटकावण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया चषक उंचावला होता. पण या सामन्यात नक्कीच झाले होते तरी काय, जाणून घेऊया...

आशियाच चषकात भारताचे नेतृत्व हे सुनील गावस्कर यांच्याकडे होते. या स्पर्धेच्या एका वर्षापूर्वी भारताने विश्वचषक जिंकला होता. तेव्हा भारताचे नेतृत्व कपिल देव यांच्याकडे होते. पण या स्पर्धेच्यावेळी कपिल यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि ते शस्त्रक्रीया करण्यासाठी लंडन येथे गेले होते. त्यामुळे संघाचे नेतृत्व गावस्कर यांच्याकडे आले होते. गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला होता. भारताने चेतन शर्मा, मदन लाल आणि मनोज प्रभाकर यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेला फक्त ९६ धावांमध्येच गुंडाळले होते. त्यानंतर हे आव्हान सुरिंदर खन्ना आणि गुलाम पारकर यांच्या फलंदाजीच्या जोरावर सहज पार केले होते.

अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या सामन्यात भारताची प्रथण फलंदाजी होती. भारताकडून खन्ना यांनी ५६, संदीप पाटील यांनी ४३ आणि कर्णधार गावस्कर यांनी नाबाद ३६ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव १३४ धावांत आटोपला होता. भारताकडून रवी शास्त्री आणि रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. खन्ना यांनी श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही सामन्यांत अर्धशतक झळकावले होते. भारताच्या संभाव्य संघात सय्यद किरमाणी हेदेखील यष्टीरक्षक होते. पण गावस्कर यांनी किरमाणी यांच्याऐवजी खन्ना यांना संधी दिली आणि त्यांचा निर्णय योग्य असल्याचे दिसून आले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज