भारताचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या फिटनेसवर भरपूर लक्ष देतो, असे म्हटले जाते. कोहलीचे बरेच व्यायाम करतानाचे व्हिडीओ तुम्हीही पाहिले असतील. कोहली हा भारतीय संघातील सर्वात फिट खेळाडू आहे, असे म्हटले जात होते. पण ही गोष्ट आता खोटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विराटची चिंता आता अजून वाढू शकते. कारण सध्याच्या घडीला विराटचा फॉर्मही चांगला नाही, त्याच्या बॅटमधून जास्त धावा पाहायला मिळत नाहीत. त्याचबरोबर न्यूझीलंडमध्ये भारताला दोन मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. आता अजून एक चिंता वाढवणारी गोष्ट कोहलीसाठी पुढे आली आहे.
सध्याच्या घडीला विराट कोहलीचे चांगला दिवस सुरु नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण न्यूझीलंडच्या दौऱ्यात कोहलीला चांगगली फलंदाजी करता आली नाही. या संपूर्ण दौऱ्यात कोहलीला एक शतकही झळकावता आले नाही. त्याचबरोबर कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पराभूत व्हावे लागले आहे. आता तर कोहलीसाठी अजून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. बीसीसीआयने भाारताच्या खेळांची यो-यो टेस्ट घेतली होती. या टेस्टचा निकाल आज आला आहे. हा निकाल पाहिल्यावर कोहलीची चिंता नक्कीच वाढणार असल्याचे दिसत आहे.
भारताच्या क्रिकेटपटूंची यो-यो टेस्ट घेण्यात आली. या यो-यो टेस्टमध्ये कोहलीला तीन क्रिकेटपटूंनी पिछाडीवर सोडल्याचे पाहायला मिळाले आहे. या यो-यो टेस्टच्या निकालावरच क्रिकेटपटूंना भारतीय संघात स्थान मिळत असते.
यो-यो टेस्चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या यो-यो टेस्टमध्ये कोहलीला १९ गुण मिळाले आहेत. पण यावेळी तीन खेळाडूंनी कोहलीला पिछाडीवर सोडले आहे. या तीन खेळाडूंमध्ये सध्या भारताच्या संघात नसलेल्या खेळाडूचाही समावेश आहे. त्यामुळे कोहलीसाठी हा चिंतेचा विषय असेल.
कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा, पण सध्या भारतीय संघात नसलेल्या करुण नायरने कोहलीला पिछाडीवर सोडले आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील मनीष पांडेनेही कोहलीला पिछाडीवर टाकले आहे. भारताच्या युवा संघातील मयंक डागर या खेळाडूनेही कोहलीला फिटनेस टेस्टमध्ये पिछाडीवर टाकले आहे.
सध्याच्या घडीला विराट कोहलीचे चांगला दिवस सुरु नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण न्यूझीलंडच्या दौऱ्यात कोहलीला चांगगली फलंदाजी करता आली नाही. या संपूर्ण दौऱ्यात कोहलीला एक शतकही झळकावता आले नाही. त्याचबरोबर कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पराभूत व्हावे लागले आहे. आता तर कोहलीसाठी अजून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. बीसीसीआयने भाारताच्या खेळांची यो-यो टेस्ट घेतली होती. या टेस्टचा निकाल आज आला आहे. हा निकाल पाहिल्यावर कोहलीची चिंता नक्कीच वाढणार असल्याचे दिसत आहे.
भारताच्या क्रिकेटपटूंची यो-यो टेस्ट घेण्यात आली. या यो-यो टेस्टमध्ये कोहलीला तीन क्रिकेटपटूंनी पिछाडीवर सोडल्याचे पाहायला मिळाले आहे. या यो-यो टेस्टच्या निकालावरच क्रिकेटपटूंना भारतीय संघात स्थान मिळत असते.
यो-यो टेस्चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या यो-यो टेस्टमध्ये कोहलीला १९ गुण मिळाले आहेत. पण यावेळी तीन खेळाडूंनी कोहलीला पिछाडीवर सोडले आहे. या तीन खेळाडूंमध्ये सध्या भारताच्या संघात नसलेल्या खेळाडूचाही समावेश आहे. त्यामुळे कोहलीसाठी हा चिंतेचा विषय असेल.
कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा, पण सध्या भारतीय संघात नसलेल्या करुण नायरने कोहलीला पिछाडीवर सोडले आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील मनीष पांडेनेही कोहलीला पिछाडीवर टाकले आहे. भारताच्या युवा संघातील मयंक डागर या खेळाडूनेही कोहलीला फिटनेस टेस्टमध्ये पिछाडीवर टाकले आहे.