नवी दिल्ली : सध्याच्या घडीला भारतीय संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. पण क्रिकेट विश्वामध्ये भारतीय संघ वर्चस्व राखणार का, या प्रश्नावर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी एक मोठे विधान केले आहे. भारतीय संघात एका गोष्टीची कमतरता आहे, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.
क्रिकेट विश्वामध्ये एकेकाळी वेस्ट इंडिजचा संघ होता जो सर्व सामने जिंकत होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाकडूनही अशीच गोष्ट पाहायला मिळाली होती आणि त्यांनी क्रिकेट विश्वावर वर्चस्व गाजवले होते. भारतीय संघही असेच क्रिकेट विश्वात वर्चस्व राखू शकते का, असा प्रश्न गावस्कर यांना विचारण्यात आला होता.
गावस्कर यांनी यावेळी सांगितले की, " भारतीय संघ वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासारखे क्रिकट विश्वात वर्चस्व राखेल, याबाबत माझ्या मनात शंका आहे. कारण भारतीय संघात सातत्याची कमी आहे आणि त्यामुळेच ही गोष्ट शक्य आहे, असे मला वाटत नाही. कारण वेस्ट इंडिजचा संघ ७०-८० या दशकांमध्ये जवळपास सर्वच सामने जिंकत होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या संघानेही असेच वर्चस्व क्रिकेट विश्वात राखले होते."
गावस्कर यांनी पुढे सांगितले की, " वेस्ट इंडिजचा संघ एकेकाळी पाचपैकी पाचही सामने जिंकत होता. ऑस्ट्रेलियाचा संघही एकेकाळी पाचपैकी चार सामने तरी जिंकत होता. पण मला माहिती नाही की, भारतीय संघ अशी कामगिरी करु शकेल की नाही. पण त्यांच्या खेळामध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही आणि हीच भारतीय संघाचा कच्चादुवा आहे. त्यामुळे भारतीय संघ क्रिकेट विश्वात वर्चस्व राखू शकणार की नाही, हे सांगणे कठीण आहे."
सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात एकाच संघाचे वर्चस्व पाहायला मिळत नाही. सध्याच्या घडीला भारताबरोबर इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज हे देश चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळए सध्याच्या घडीला तर पूर्वीसारखे एकाच देशाचे वर्चस्व पाहायला मिळणे कठीण समजले जात आहे.
क्रिकेट विश्वामध्ये एकेकाळी वेस्ट इंडिजचा संघ होता जो सर्व सामने जिंकत होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाकडूनही अशीच गोष्ट पाहायला मिळाली होती आणि त्यांनी क्रिकेट विश्वावर वर्चस्व गाजवले होते. भारतीय संघही असेच क्रिकेट विश्वात वर्चस्व राखू शकते का, असा प्रश्न गावस्कर यांना विचारण्यात आला होता.
गावस्कर यांनी यावेळी सांगितले की, " भारतीय संघ वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासारखे क्रिकट विश्वात वर्चस्व राखेल, याबाबत माझ्या मनात शंका आहे. कारण भारतीय संघात सातत्याची कमी आहे आणि त्यामुळेच ही गोष्ट शक्य आहे, असे मला वाटत नाही. कारण वेस्ट इंडिजचा संघ ७०-८० या दशकांमध्ये जवळपास सर्वच सामने जिंकत होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या संघानेही असेच वर्चस्व क्रिकेट विश्वात राखले होते."
सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात एकाच संघाचे वर्चस्व पाहायला मिळत नाही. सध्याच्या घडीला भारताबरोबर इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज हे देश चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळए सध्याच्या घडीला तर पूर्वीसारखे एकाच देशाचे वर्चस्व पाहायला मिळणे कठीण समजले जात आहे.