मुंबई : दमदार फलंदाजीसोबतच धारदार आणि भेदक गोलंदाजी आक्रमणामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केला असतानाच वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने भारताच्या गोलंदाजीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. भारताची सध्याची वेगवान गोलंदाजी पाहून ८० आणि ९०च्या दशकातील वेस्ट इंडिजचा संघ माझ्या डोळ्यापुढे उभा राहतो, अशा शब्दांत लाराने भारतीय गोलंदाजांची पाठ थोपटली.
भारताकडे सध्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीसह एकापेक्षा एक सरस असे भेदक गोलंदाज आहेत. त्याकडे बोट दाखवत लाराने भारतीय संघाची स्तुती केली. सध्याच्या भारताच्या संघात असं काय खास आहे, असं विचारलं असता वेगवान गोलंदाजी आक्रमण हे भारताचं बलस्थान असल्याचे लारा म्हणाला. मी या संघाला वेस्ट इंडिजमध्ये खेळताना पाहिलं आहे. बुमराह, शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार सगळेच प्रभावी मारा करणारे वेगवान गोलंदाज आहेत. भारताची सध्याची गोलंदाजी पाहिल्यानंतर मला ८० आणि ९०च्या दशकातील आमचा संघ आठवतो, असे लारा म्हणाला. ११ खेळाडू मैदानात खेळत असताना राखीव बाकांवर बसलेले खेळाडू किती सक्षम आहेत, यावरून तुमच्या संघाची क्षमता जोखली जाते. या अंगाने पाहिल्यास भारताकडे प्रभावी गोलंदाजी आक्रमणासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असे निरीक्षणही लाराने नोंदवले.
त्रिकुटाने टिपले १४२ बळी
विशेष म्हणजे चांगल्या फलंदाजांचा दुष्काळ भारताला कधीच नव्हता मात्र गोलंदाजी आक्रमणात अनेक उणिवा होत्या. गेल्या काही वर्षांत हा दुष्काळ दूर झाला आहे. भारताकडे अनेक वेगवान गोलंदाज आज उपलब्ध आहेत. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक गोलंदाजांमध्ये चुरस लागली आहे. त्याचवेळी कसोटीत गोलंदाजी आक्रमणाची धुरा वाहणाऱ्या बुमराह, इशांत आणि शमी या त्रिकुटाने २०१८ या एका वर्षात १४२ बळी टिपून विरोधी संघांची दाणादाण उडवली आहे. याच पार्श्वभूमीवर लाराने भारतीय गोलंदाजी आक्रमणाचं कौतुक केलं आहे.
भारतीय संघाचा प्रवास योग्य दिशेने!
'रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज'ची घोषणा आज झाली. यावेळी उपस्थित असलेल्या लाराने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचंही कौतुक केलं. विराट एक उत्कृष्ट कर्णधार आहे. नेतृत्व सांभाळताना तो स्वत:ही चांगला खेळ करत आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेरही तो सरस आहे. महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटच्या यशाचा पाया रचला, तर कोहली आता त्याच्या स्टाइलने संघाला पुढे घेऊन चालला आहे. भारतीय संघाचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे, असेही लारा पुढे म्हणाला.
भारताकडे सध्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीसह एकापेक्षा एक सरस असे भेदक गोलंदाज आहेत. त्याकडे बोट दाखवत लाराने भारतीय संघाची स्तुती केली. सध्याच्या भारताच्या संघात असं काय खास आहे, असं विचारलं असता वेगवान गोलंदाजी आक्रमण हे भारताचं बलस्थान असल्याचे लारा म्हणाला. मी या संघाला वेस्ट इंडिजमध्ये खेळताना पाहिलं आहे. बुमराह, शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार सगळेच प्रभावी मारा करणारे वेगवान गोलंदाज आहेत. भारताची सध्याची गोलंदाजी पाहिल्यानंतर मला ८० आणि ९०च्या दशकातील आमचा संघ आठवतो, असे लारा म्हणाला. ११ खेळाडू मैदानात खेळत असताना राखीव बाकांवर बसलेले खेळाडू किती सक्षम आहेत, यावरून तुमच्या संघाची क्षमता जोखली जाते. या अंगाने पाहिल्यास भारताकडे प्रभावी गोलंदाजी आक्रमणासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असे निरीक्षणही लाराने नोंदवले.
त्रिकुटाने टिपले १४२ बळी
विशेष म्हणजे चांगल्या फलंदाजांचा दुष्काळ भारताला कधीच नव्हता मात्र गोलंदाजी आक्रमणात अनेक उणिवा होत्या. गेल्या काही वर्षांत हा दुष्काळ दूर झाला आहे. भारताकडे अनेक वेगवान गोलंदाज आज उपलब्ध आहेत. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक गोलंदाजांमध्ये चुरस लागली आहे. त्याचवेळी कसोटीत गोलंदाजी आक्रमणाची धुरा वाहणाऱ्या बुमराह, इशांत आणि शमी या त्रिकुटाने २०१८ या एका वर्षात १४२ बळी टिपून विरोधी संघांची दाणादाण उडवली आहे. याच पार्श्वभूमीवर लाराने भारतीय गोलंदाजी आक्रमणाचं कौतुक केलं आहे.
भारतीय संघाचा प्रवास योग्य दिशेने!
'रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज'ची घोषणा आज झाली. यावेळी उपस्थित असलेल्या लाराने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचंही कौतुक केलं. विराट एक उत्कृष्ट कर्णधार आहे. नेतृत्व सांभाळताना तो स्वत:ही चांगला खेळ करत आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेरही तो सरस आहे. महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटच्या यशाचा पाया रचला, तर कोहली आता त्याच्या स्टाइलने संघाला पुढे घेऊन चालला आहे. भारतीय संघाचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे, असेही लारा पुढे म्हणाला.