अ‍ॅपशहर

जागतिक क्रिकेटमध्ये १५ वर्षानंतर होणार ही घटना; मोदी सरकारला न विचारता BCCIने घेतला धाडसी निर्णय

India Pakistan Tour: भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबर रोजी लढत होणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या लढतीच्या आधी बीसीसीआयने एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2022, 7:19 pm
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या कालावधीपासून कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. टीम इंडियाने २००८ साली अखेरचा पाकिस्तान दौरा केला होता. दोन्ही देशातील राजकीय संबंधात तणाव असल्यामुळे द्विपक्षीय मालिका बंद झाल्या आहेत. अशात दोन्ही बाजूच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganguly modi


भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्ष म्हणजेच २०२३ साली पाकिस्तानचा दौरा करू शकते. पाकिस्तानला २०२३ च्या आशिया कपचे यजमानपद मिळाले आहे आणि बीसीसीआय या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास तयार आहे.

वाचा- क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका; पुढील इतकी वर्ष भारत-पाकिस्तान मालिका होणार...

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा केंद्र सरकार त्यांना परवानगी देईल. भारतीय क्रिकेट बोर्डाने हे स्पष्टपणे सांगितले आहे की आशिया कप २०२३ साठी ते संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास तयार आहे. यासाठी बीसीसीआयच्या एजीएमच्या बैठकीत मंजूरी देखील मिळाली आहे.

वाचा- टी-२० वर्ल्डकपसाठी BCCIचा मोठा निर्णय; बुमराहच्या जागी मिळाली अनुभवी...

राजकीय संबंधांमुळे...

क्रिकेट मैदानावर जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांच्या समोर येतात तेव्हा संपूर्ण जगभरातील चाहते मॅचचा थरार पाहण्यासाठी गोळा होतात. पण गेल्या काही वर्षात काही निवडक स्पर्धेत या दोन संघात सामने होतात. दोन्ही देशात द्विपक्षीय मालिका बंद आहेत. यामागे राजकीय तणाव जबाबदार आहे. अशाच २०२३ साली आशिया कपच्या निमित्ताने भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ शकतो. या निमित्ताने दोन्ही देशातील संबंध सुधारण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे दोन्ही संघात पुन्हा एकदा द्विपक्षीय मालिका पाहायला मिळेल.

वाचा- टी-२० वर्ल्डकपच्या आधीच उघडी पडली टीम इंडिया; असंच चालू राहिलं तर...

या वर्षी आशिया कपमध्ये भारत-पाक यांच्यात दोन लढती झाल्या होत्या. आता २३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये पुन्हा हे दोन संघ भिडतील.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख