मुंबई : आयर्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. भारतीय संघाची घोषणा होताच पुणेकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी आल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारतीय संघाच्या घोषणेनंतर पुणेकरांसाठी कोणती आनंदाची बातमी आली, पाहा...
बीसीसीआयने आज आयर्लंडच्या दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला. या संघात सलामीवीराची जबाबदारी ही इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यावर कायम ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर आयपीएल गाजवणाऱ्या राहुल त्रिपाठीला यावेळी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. ऋतुराज आणि राहुल हे दोघेही पुण्याचे खेळाडू आहेत. बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर पुण्याच्या दोन खेळाडूंची निवड भारतीय संघात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या ट्वेन्टी-२० संघात तर दोन पुणेकर खेळाडू असल्याची ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळे पुणेकरांसाठी गेल्या काही वर्षांतील ही आनंदाची बातमी असेल. काही महिन्यांपूर्वी केदार जाधव हा भारताच्या ट्वेन्टी-२० संघात होता. त्यानंतर ऋतुराज भारताच्या ट्वेन्टी-२० संघातून खेळत आहे, आता राहुलने भारताच्या संघात प्रवेश केला आहे.
या दौऱ्यासाठी भारताचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे देण्यात आले आहे. भारताचे महत्वाचे खेळाडू यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यात व्यस्त असतील. त्यामुळे हा नवीन संघ बीसीसीआयने निवडला आहे. या संघाचे उपकर्णधारपद यावेळी भुवनेश्वर कुमारला देण्यात आले आहे. भारतीय संघात दीपक हुडा आणि वेंकटेश अय्यर हे दोन अष्टपैलू खेळाडू असतील. भारताच्या वेगवान गोलंदाजीची मदार आता हर्षल पटेल, अवेश खान, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल. त्याचबरोबर या संघात तीन फिरकी गोलंदाज असतील. यामध्ये युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारताचा संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, अवेश खान, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.
भारतीय संघाच्या घोषणेनंतर पुणेकरांसाठी कोणती आनंदाची बातमी आली, पाहा...
बीसीसीआयने आज आयर्लंडच्या दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला. या संघात सलामीवीराची जबाबदारी ही इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यावर कायम ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर आयपीएल गाजवणाऱ्या राहुल त्रिपाठीला यावेळी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. ऋतुराज आणि राहुल हे दोघेही पुण्याचे खेळाडू आहेत. बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर पुण्याच्या दोन खेळाडूंची निवड भारतीय संघात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या ट्वेन्टी-२० संघात तर दोन पुणेकर खेळाडू असल्याची ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळे पुणेकरांसाठी गेल्या काही वर्षांतील ही आनंदाची बातमी असेल. काही महिन्यांपूर्वी केदार जाधव हा भारताच्या ट्वेन्टी-२० संघात होता. त्यानंतर ऋतुराज भारताच्या ट्वेन्टी-२० संघातून खेळत आहे, आता राहुलने भारताच्या संघात प्रवेश केला आहे.
या दौऱ्यासाठी भारताचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे देण्यात आले आहे. भारताचे महत्वाचे खेळाडू यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यात व्यस्त असतील. त्यामुळे हा नवीन संघ बीसीसीआयने निवडला आहे. या संघाचे उपकर्णधारपद यावेळी भुवनेश्वर कुमारला देण्यात आले आहे. भारतीय संघात दीपक हुडा आणि वेंकटेश अय्यर हे दोन अष्टपैलू खेळाडू असतील. भारताच्या वेगवान गोलंदाजीची मदार आता हर्षल पटेल, अवेश खान, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल. त्याचबरोबर या संघात तीन फिरकी गोलंदाज असतील. यामध्ये युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारताचा संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, अवेश खान, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.