अ‍ॅपशहर

कानपूरमधील ड्रॉमुळे टीम इंडियाला बसला मोठा फटका; WTCमध्ये पाकिस्तान जाणार पुढे

INDvsNZ : न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकल्यास भारतीय संघाला १२ गुण मिळाले असते, पण ही संधी संघाने गमावली आणि त्यांना न्यूझीलंडसोबत गुण वाटून घ्यावे लागले.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 30 Nov 2021, 9:10 am
कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या किवी संघाला ९ गड्यांच्या मोबदल्यात १६५ धावाच करता आल्या. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी न्यूझीलंडचे ७ गडी बाद केले, पण शेवटची विकेट त्यांना घेण्यात अपयश आले. अंधुक प्रकाशामुळे हा सामना थांबविण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indvsnz 2021 wtc points table icc test championship kanpur test draw
कानपूरमधील ड्रॉमुळे टीम इंडियाला बसला मोठा फटका; WTCमध्ये पाकिस्तान जाणार पुढे


वाचा- राहुल आणि राशिदची IPL मधून होणार सुट्टी; पंजाब-हैदराबादच्या तक्रारीनंतर BCCI करणार कारवाई

हा सामना अनिर्णित राहिल्याने भारताचे चार गुण झाले असून आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत एकूण ३० गुण झाले आहेत. या यादीत श्रीलंका अव्वल स्थानावर आहे, कारण त्यांच्या गुणांची टक्केवारी (परसेंटेज ऑफ प्वॉइंट्स) भारतापेक्षा जास्त आहे, असे असले तरी एकूण गुणांच्या बाबतीत श्रीलंका भारतापेक्षा खूपच खाली आहे. श्रीलंकेचे फक्त १२ गुण आहेत.

वाचा- Video : नशीबच खराब! चांगल्या डिफेन्सनंतरही किवी खेळाडू दुर्दैवपणे झाला बाद

गुणांच्या टक्केवारीच्या आधारे संघाची क्रमवारी निश्चित केली जाते. विजयासाठी १२ गुण, सामना बरोबरीत सुटला तर ६ गुण, अनिर्णित सामन्यासाठी चार गुण आणि पराभवासाठी कोणतेही गुण नाहीत. जिंकल्यानंतर १०० परसेंटेज ऑफ पॉइंट्स, सामना बरोबरीत राहिला की ५० परसेंटेज ऑफ पॉइंट्स, अनिर्णित राहिल्यास ३३.३३ परसेंटेज ऑफ पॉइंट्स आणि सामना हरल्यानंतर शून्य परसेंटेज ऑफ पॉइंट्स मिळतात.



वाचा- एका विकेटने दिली विजयाची हुलकावणी; कानपूर कसोटी ड्रॉ, न्यूझीलंडने सामना वाचवला

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत भारत आणि श्रीलंकेची चर्चा होत आहे. पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचे सध्या श्रीलंकेइतकेच १२ गुण आहेत. या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, ज्यापैकी एक जिंकला आहे, तर एकात पराभव पत्करावा लागला आहे. जर पाकिस्तानने चितगाव येथे सुरू असलेला बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला, तर ते दुसऱ्या स्थानावर जातील. पाकिस्ताननंतर वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंडचा क्रमांक लागतो. तर ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेने अजूनही खाते उघडलेले नाही.

वाचा- मुंबई कसोटी: कोहलीच्या एन्ट्रीनंतर कोण जाणार बाहेर? रहाणे-पुजाराबाबत प्रशिक्षकांनी...

मुंबईमध्ये होणारा दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका जिंकण्याची संधी टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांकडे आहे. ३ डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज