सेंच्युरियन : येथील सुपरस्पोर्ट्स पार्कवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत तीन दिवसातच भारताचे पारडे जड दिसत आहे. यजमान संघाला १९७ धावांत गुंडाळण्यात मोहम्मद शमीचा मोठा वाटा होता. शमीने फक्त पाच विकेट घेतल्या नाहीत, तर कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पाही ओलांडला आहे. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने आपल्या यशाचे श्रेय वडिलांना दिले.
वाचा- भारतीय क्रिकेटपटू दुसऱ्यांदा झाला बाप; मुलाचे नाव केले जाहीर
३० किमी सायकलिंगचा किस्सा
मोहम्मद शमीने सांगितले की, जागतिक क्रिकेटमधील त्याच्या यशात त्याच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. वडिलांच्या पाठिंब्याशिवाय तो या टप्प्यावर पोहोचला नसता, असे शमीने सांगितले. यूपीच्या अमरोहापासून टीम इंडिया पर्यंतचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. शमीचे वडील त्याला रोज ३० किमी सायकल चालवून क्रिकेट अॅकॅडमीत सोडायचे. २०१७ मध्ये शमीच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला.
वाचा- पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचे लाईव्ह अपडेट
बळींचे 'दुहेरी शतक'
एका डावात पाच विकेट घेण्याची त्याची कारकिर्दीतील ही सहावी वेळ आहे. दक्षिण आफ्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा एका डावात पाच बळी घेणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. शमीने ५५ व्या कसोटीत २०० कसोटी बळींचा टप्पा गाठला. या बाबतीत तो तिसरा वेगवान भारतीय गोलंदाज आहे. कपिल देव यांनी ५०, तर जवागल श्रीनाथने ५४ कसोटीत हा आकडा गाठला.
वाचा- पहिल्या कसोटीत भारताला विजयाची संधी; फक्त या एका गोष्टीचा अडथळा
दरम्यान, ३१ वर्षीय या वेगवान गोलंदाजाला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. पहिल्या पत्नीने अन्य महिलांशी शमीचे संबंध असल्याचे आरोप करून खळबळ उडवून दिली होती. २०१७मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर काही लोकांनी त्याला त्याच्या धर्मावरून चांगले-वाईट म्हटले होते.
आफ्रिकेचे कंबरडे मोडले
यजमान संघाला पहिला धक्का जसप्रीत बुमराहने डावाच्या पाचव्या चेंडूवर कर्णधार डीन एल्गरला (१) बाद करून दिला. त्यानंतर शमीने उपाहारानंतर तिसऱ्या चेंडूवर कीगन पीटरसनला (१५) त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्याने एडन मार्करमचाही (१३) त्रिफळा उडवला. लागोपाठच्या या दोन धक्क्यांनी यजमानांची कंबर मोडली आणि ते पूर्णपणे बॅकफूटवर आले. दुसरे सत्र संपण्यापूर्वी मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली होती.
वाचा- भारतीय क्रिकेटपटू दुसऱ्यांदा झाला बाप; मुलाचे नाव केले जाहीर
३० किमी सायकलिंगचा किस्सा
मोहम्मद शमीने सांगितले की, जागतिक क्रिकेटमधील त्याच्या यशात त्याच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. वडिलांच्या पाठिंब्याशिवाय तो या टप्प्यावर पोहोचला नसता, असे शमीने सांगितले. यूपीच्या अमरोहापासून टीम इंडिया पर्यंतचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. शमीचे वडील त्याला रोज ३० किमी सायकल चालवून क्रिकेट अॅकॅडमीत सोडायचे. २०१७ मध्ये शमीच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला.
वाचा- पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचे लाईव्ह अपडेट
बळींचे 'दुहेरी शतक'
एका डावात पाच विकेट घेण्याची त्याची कारकिर्दीतील ही सहावी वेळ आहे. दक्षिण आफ्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा एका डावात पाच बळी घेणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. शमीने ५५ व्या कसोटीत २०० कसोटी बळींचा टप्पा गाठला. या बाबतीत तो तिसरा वेगवान भारतीय गोलंदाज आहे. कपिल देव यांनी ५०, तर जवागल श्रीनाथने ५४ कसोटीत हा आकडा गाठला.
वाचा- पहिल्या कसोटीत भारताला विजयाची संधी; फक्त या एका गोष्टीचा अडथळा
दरम्यान, ३१ वर्षीय या वेगवान गोलंदाजाला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. पहिल्या पत्नीने अन्य महिलांशी शमीचे संबंध असल्याचे आरोप करून खळबळ उडवून दिली होती. २०१७मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर काही लोकांनी त्याला त्याच्या धर्मावरून चांगले-वाईट म्हटले होते.
आफ्रिकेचे कंबरडे मोडले
यजमान संघाला पहिला धक्का जसप्रीत बुमराहने डावाच्या पाचव्या चेंडूवर कर्णधार डीन एल्गरला (१) बाद करून दिला. त्यानंतर शमीने उपाहारानंतर तिसऱ्या चेंडूवर कीगन पीटरसनला (१५) त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्याने एडन मार्करमचाही (१३) त्रिफळा उडवला. लागोपाठच्या या दोन धक्क्यांनी यजमानांची कंबर मोडली आणि ते पूर्णपणे बॅकफूटवर आले. दुसरे सत्र संपण्यापूर्वी मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली होती.