लंडन : शिखर धवनच्या नेतृत्वातील टीम इंडियाने यजमान श्रीलंकेला हरवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली. श्रीलंकेने दिलेल्या 276 धावांचे लक्ष्य भारताने 5 चेंडू राखत पूर्ण केलं. भारतीय संघाच्या 193 धावा झाल्या असताना 7 विकेट गेल्या होत्या. त्यावेळी भारत हा सामना जिंकेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. श्रीलंकेच्या हातात सामना होता, पण दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी लंकेचे मनसुबे उधळून लावले. आठव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. चहरने विजयी चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
वाचा- दीपक फलंदाजी करत होता, तेव्हा कोच द्रविड काय करत होते; सर्वजण करत आहेत कौतुक
वेगवान गोलंदाज दीपक चहरने 82 चेंडूत 7 चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद 69 धावांची खेळी केली. त्याला भुवनेश्वर कुमारने चांगली साथ दिली. भुवीने 28 चेंडूत 2 चौकारासह 19 धावा केल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 53 धावा केल्या.
वाचा- सर्वांनी आशा सोडल्या होत्या, पराभव होणाऱ्या सामन्यात दीपकने अफलातून विजय...
कोहलीनं केलं कौतुक
इंग्लंड दौऱ्यावरील मुख्य संघाचा कर्णधार विराट कोहलीने टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. दीपक चहर आणि सूर्यकुमार यादववर कोहलीने स्तुतीसुमने उधळली आहेत. कोहलीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'शानदार विजय, कठीण परिस्थितीतून विजय मिळविण्याचा आश्चर्यकारक प्रयत्न होता. सामना पाहायला मजा आली. दीपक चहर आणि सूर्यकुमारने शानदार खेळ केला. दडपणाखाली खेळली गेलेली ही जबरदस्त खेळी आहे.'
वाचा- विजयानंतर पाहा काय म्हणाले, कोच द्रविड सर; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेने 9 विकेटच्या बदल्यात 275 धावा करत भारतापुढे समाधानकारक धावसंख्या उभारली होती. फर्नांडो आणि मिनोद भानुका (36) यांनी 77 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरवात करून दिली होती. त्यानंतर गोलंदाजांनीही सुरवातीपासून भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले होते. पण चहर आणि भुवीने लंकेचे सगळे मनसुबे उधळून लावले.
वाचा- Video: असे खेळला तर इंग्लंडकडून ५-० पराभव पक्का, लॉलीपॉप चेंडूवर बोल्ड झाला
इंग्लंडमध्ये सामना पाहत होते भारतीय खेळाडू...
वाचा- दीपक फलंदाजी करत होता, तेव्हा कोच द्रविड काय करत होते; सर्वजण करत आहेत कौतुक
वेगवान गोलंदाज दीपक चहरने 82 चेंडूत 7 चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद 69 धावांची खेळी केली. त्याला भुवनेश्वर कुमारने चांगली साथ दिली. भुवीने 28 चेंडूत 2 चौकारासह 19 धावा केल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 53 धावा केल्या.
वाचा- सर्वांनी आशा सोडल्या होत्या, पराभव होणाऱ्या सामन्यात दीपकने अफलातून विजय...
कोहलीनं केलं कौतुक
इंग्लंड दौऱ्यावरील मुख्य संघाचा कर्णधार विराट कोहलीने टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. दीपक चहर आणि सूर्यकुमार यादववर कोहलीने स्तुतीसुमने उधळली आहेत. कोहलीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'शानदार विजय, कठीण परिस्थितीतून विजय मिळविण्याचा आश्चर्यकारक प्रयत्न होता. सामना पाहायला मजा आली. दीपक चहर आणि सूर्यकुमारने शानदार खेळ केला. दडपणाखाली खेळली गेलेली ही जबरदस्त खेळी आहे.'
वाचा- विजयानंतर पाहा काय म्हणाले, कोच द्रविड सर; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेने 9 विकेटच्या बदल्यात 275 धावा करत भारतापुढे समाधानकारक धावसंख्या उभारली होती. फर्नांडो आणि मिनोद भानुका (36) यांनी 77 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरवात करून दिली होती. त्यानंतर गोलंदाजांनीही सुरवातीपासून भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले होते. पण चहर आणि भुवीने लंकेचे सगळे मनसुबे उधळून लावले.
वाचा- Video: असे खेळला तर इंग्लंडकडून ५-० पराभव पक्का, लॉलीपॉप चेंडूवर बोल्ड झाला
इंग्लंडमध्ये सामना पाहत होते भारतीय खेळाडू...